EC Notice : मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

EC Notice : मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षात असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. आता निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांची दखल घेतली आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. दोन्ही पक्षांना 29 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचार संहितेचे उल्लंघन झाल्या प्रकरणाची दखल घेतली आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनी परस्परांवर धर्म, जाती, समुदाय, भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन निर्माण केल्याचा आरोप केला होता.

राजकीय पक्षांना आपले उमेदवार, स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. उच्च पदावरील व्यक्तींच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना वक्तव्य केलं होतं. जन प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 नुसार कलम 77 अंतर्गत ‘स्टार प्रचारकाचा’ दर्जा देणे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या अखत्यारितील विषय आहे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणातून गुणवत्ता वाढीची अपेक्षा असते.

पंतप्रधान मोदींनी काय वक्तव्य केलेलं?

काँग्रेसच सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाटू शकतात. पीएम मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली. पंतप्रधान हिंदू-मुस्लिम करतायत असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून मागितलं उत्तर

निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून उत्तर मागितलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदी यांच्यावर तर, बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर आचार संहिता उल्लंघनाचा आरोप केला होता.

राहुल गांधी यांच्यावर काय आरोप होता?

राहुल गांधी त्यांच्यासभेत ज्या भाषेचा, शब्दांचा वापर करतात, त्यावरुन भाजपाने राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाने केला होता. राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. लिखित तक्रारीत भाजपाने राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गेल्या तीन वर्षांत देण्यात आलेल्या सर्व भोगवटा प्रमाणपत्र व भरलेल्या प्रीमियमच्या रकमेची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती...
एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट