इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली; १३ ऑक्टोबरकडे डोळे

इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली; १३ ऑक्टोबरकडे डोळे

ठाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांचे आणि जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये असलेल्या १०८ गणांच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे डोळे आता या सोडतीकडे लागले आहेत. आपल्या गटात तसेच गणात कोणते आरक्षण पडेल या विचाराने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट भिवंडी तालुक्यात २१ तर सर्वात कमी गट अंबरनाथ तालुक्यात ४ इतके आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांची निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित केल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ अशा पाच पंचायत समिती आहेत. या सर्वच पंचायत समितीमध्ये १०८ इतके गण आहेत. या गट आणि गणांच्या आरक्षणासाठी येत्या १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने गट आणि गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. आपला हक्काचा गट किंवा गण आपल्याकडे कायम राहतो की दुसऱ्या कोणाच्या वाट्याला जातो, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.

आरक्षण सोडतीमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षित असलेल्या गट आणि गणांतील उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे तयार करण्याकरिता सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी दिला जातो. त्यामुळे ही निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीत होणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
अंडी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण अंडी हा पोषणाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्यामध्ये...
दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दिल्लीत JNU विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की; 28 विद्यार्थी ताब्यात
Mumbai News – बनावट सोन्याची बिस्किटे देऊन दागिने घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस
Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान