मुंबईत भीक मागून घेतली तीन एकर जमीन, मुलीचे थाटात केले लग्न, पण शेवटी…

मुंबईत भीक मागून घेतली तीन एकर जमीन, मुलीचे थाटात केले लग्न, पण शेवटी…

मुंबई मायानगरी. अनेक जण आपले नशिब अजमवण्याासाठी मुंबईत येतात. गेल्या 38 वर्षांपूर्वी कराडमधून शांताबाई मुंबईत आली होती. काहीच कामधंदा नसल्यामुळे तिने भीक मागण्याचे काम सुरु केले. या भीक मागण्याच्या उद्योग सुरु केला. यामधून त्यांना महिन्याला 25 ते 35 हजार रुपये मिळत होते. त्यातील 25 हजार रुपये त्या कराडला राहणाऱ्या मुलीकडे पाठवत होत्या. त्यानंतर उरलेले पैसे स्वत:साठी खर्च करत होत्या. शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने या पैशांमधून सुमारे 3 एकर जमीन खरेदी केली. त्यावर शेती सुरु केली. आज त्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन आहे. तसेच उर्वरित जमिनीवर घरे बांधून त्यातून दरमहा लाखो रुपये भाडे मिळत आहेत. त्या शांताबाईंचे मुंबईत शुक्रवारी संशयास्पद निधन झाले. त्यांच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबईत आल्या आणि भीक मागणे सुरु केले

शांताबाई यांचे पती गावात शेती करत होते. पतीच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्याकडे कोणताही व्यवसाय उरला नाही. त्यामुळे 38 वर्षांपूर्वी त्या मुंबईत आल्या. त्यांनी मुंबईत येऊन भीक मागण्याचे काम सुरु केले. म्हणजेच गेल्या जवळपास 35-36 वर्षांपासून त्या मुंबईत भीक मागत होत्या. भीक मागूनच त्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते.

चिंचोली बंदरमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्य

विशेष म्हणजे, शांताबाई स्वत: शेवटच्या दिवसांपर्यंत मालाडच्या विठ्ठल नगर, चिंचोली बंदर येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. या घरासाठी त्या दरमहा चार हजार रुपये घरमालकाला देत होत्या. याच घरात गेल्या आठवड्यात शुक्रवारी शांताबाई यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. त्यानंतर मलाड पोलिसांनी हत्या आणि चोरीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात तपास करुन 45 वर्षीय बैजू महादेव मुखिया याला अटक केली आहे.

बैजू शांताबाईच्या पूर्वी त्या घरात राहत होता. त्याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणात बैजू याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;