ऐश्वर्या राय, विराट कोहलीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी? भाजपवर टीका करताना सेलिब्रिटींचा उल्लेख

ऐश्वर्या राय, विराट कोहलीबद्दल काय म्हणाले राहुल गांधी? भाजपवर टीका करताना सेलिब्रिटींचा उल्लेख

काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये ते त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर बोलताना दिसले. “मला राजकारणात रस नाही, मी गंभीर नाही, असं ते मीडियासमोर बोलायचे”, असं म्हणत त्यांनी पुढे अभिनेत्री ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर विराट कोहली यांचा उल्लेख केला. या तिन्ही मोठ्या सेलिब्रिटींचं नाव घेत राहुल गांधीनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी?

“माझ्याबद्दल ते मीडियात म्हणायचे की मला राजकारणात रस नाही, मी राजकारणाविषयी गंभीर नाही. त्यांच्यासाठी मनरेगा आणि भूसंपादन विधेयकाबाबत लढणारा गंभीर नाही, तर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि विराट कोहली यांच्याविषयी बोलणारा गंभीर आहे का”, असा सवाल त्यांनी केला. नवी दिल्लीतल्या सामाजिक न्याय संमेलनात राहुल गांधी बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, “काही लोकच मुद्द्यांवर चर्चा करतात आणि मत व्यक्त करतात. पण 90 टक्के लोक काय विचार करतात, याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मी त्या 90 टक्के लोकांविषयी बोलतो, म्हणून मला गंभीर नसल्याचं म्हटलं जातं.” मीडियात एकसुद्धा आदिवासी, दलित आणि ओबीसी अँकर नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.


राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात अशा पद्धतीने ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडमध्ये ट्रान्सपोर्ट नगर चौकमधील सभेत राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिरात आयोजित केलेल्या भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमाला ओबीसीचे कोणतेच सदस्य का नव्हते, असा सवाल त्यांनी केला होता. “मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अंबानी, अदानी आणि सर्व बिझनेसच्या लोकांना पाहिलं, पण मला त्यात एकही गरीब माणूस दिसला नाही. एकही शेतकरी, मजूर, बेरोजगार व्यक्ती त्या सोहळ्याला उपस्थित नव्हती”, असं ते म्हणाले होते.

दुसऱ्या एका रॅलीतही त्यांनी ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला होता. “ऐश्वर्या डान्स करताना दिसेल आणि बच्चन साहेब बल्ले बल्ले करताना दिसतील”, असा टोला त्यांनी लगावला होता. यानंतर त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून बरीच टीका झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गेल्या तीन वर्षांत देण्यात आलेल्या सर्व भोगवटा प्रमाणपत्र व भरलेल्या प्रीमियमच्या रकमेची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती...
एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट