पार्थच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्या; वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवार यांचा संताप

पार्थच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्या; वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवार यांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही टोला लगावला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवारही बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकार निशाणा साधला आहे. ‘पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिली. आता रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही अशीच सुरक्षा देण्यात यावी. त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पार्थच्या वडिलांनी पॅचअप केले, मी मात्र त्याच्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवार यांनी अजित पवारांना डिवचले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ही राज्याच्या संपत्तीची उधळपट्टी आहे. सुरक्षेची यांना गरज नाही. बऱ्याच जणांना सुरक्षेची गरज आहे. पण त्यांना सुरक्षा दिली जात नाही. यांना गरज नसताना सुरक्षा दिली जातेय. सरकारची ही उधळपट्टी सुरू आहे. सुरक्षेचा आढावा घेतला पाहिजे. सगळ्यांना सरसकट का दिली पाहिजे? नाहीतर मग द्या सर्व 288 आमदारांना वाय प्लस सुरक्षा. विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना द्या सुरक्षा. ते 40 कोणते मानाचे आहेत का?’, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

आधी आदिलशाहकडून जॉइनची ऑफर यायची, आता अमित शहांकडून येते; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

‘वाय प्लस दर्जाची सुरक्षा ही कमी आहे. त्यांना झेड सेक्युरीटी द्या. अजून चार पाच गाड्या वाढवा. कोयता गँग सामान्यांना त्रास देतेय. हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना सुरक्षा दिली जात नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच काम करत आहेत. सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे. नेत्यांना सांभाळणं आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणं. पार्थला अजून दोन तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे. रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा’, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;