पार्थच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्या; वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवार यांचा संताप

पार्थच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्या; वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवार यांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही टोला लगावला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवारही बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकार निशाणा साधला आहे. ‘पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिली. आता रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही अशीच सुरक्षा देण्यात यावी. त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पार्थच्या वडिलांनी पॅचअप केले, मी मात्र त्याच्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवार यांनी अजित पवारांना डिवचले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ही राज्याच्या संपत्तीची उधळपट्टी आहे. सुरक्षेची यांना गरज नाही. बऱ्याच जणांना सुरक्षेची गरज आहे. पण त्यांना सुरक्षा दिली जात नाही. यांना गरज नसताना सुरक्षा दिली जातेय. सरकारची ही उधळपट्टी सुरू आहे. सुरक्षेचा आढावा घेतला पाहिजे. सगळ्यांना सरसकट का दिली पाहिजे? नाहीतर मग द्या सर्व 288 आमदारांना वाय प्लस सुरक्षा. विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना द्या सुरक्षा. ते 40 कोणते मानाचे आहेत का?’, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

आधी आदिलशाहकडून जॉइनची ऑफर यायची, आता अमित शहांकडून येते; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

‘वाय प्लस दर्जाची सुरक्षा ही कमी आहे. त्यांना झेड सेक्युरीटी द्या. अजून चार पाच गाड्या वाढवा. कोयता गँग सामान्यांना त्रास देतेय. हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना सुरक्षा दिली जात नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच काम करत आहेत. सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे. नेत्यांना सांभाळणं आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणं. पार्थला अजून दोन तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे. रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा’, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय तीन वर्षांत दिलेली भोगवटा प्रमाणपत्र, भरलेल्या रकमेची पडताळणी करणार; नगर मनपा आयुक्त जावळे यांचा निर्णय
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गेल्या तीन वर्षांत देण्यात आलेल्या सर्व भोगवटा प्रमाणपत्र व भरलेल्या प्रीमियमच्या रकमेची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती...
एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार, मदतीसाठी सैन्य तैनात; दिवसभरात 60 तर दोन आठवड्यात 370 जण दगावले
… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट