मोदी सरकारमुळेच देश सोडावा लागतोय, महिला पत्रकाराचा आरोप

मोदी सरकारमुळेच देश सोडावा लागतोय, महिला पत्रकाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र एका महिला पत्रकाराने व्हिसा वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने देश सोडला आहे. त्यांनी केलेलं वार्तांकन हे मर्यादा ओलांडणारं असल्याचा ठपका ठेवून त्यांचा व्हिसा वाढवण्यास नकार देण्यात आला आहे.

या पत्रकाराचं नाव अवनी डायस असं आहे. अवनी डायस या ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशियाई ब्युरो प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येसंदर्भात केलेल्या वार्तांकनावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. त्या वार्तांकनात मी माझ्या मर्यादा ओलांडल्याचं कारण देत मोदी सरकारने गेल्या आठवड्यात माझा व्हिसा वाढवण्यास नकार दिला, त्यामुळे 19 एप्रिल रोजी देश सोडावा लागला, असं अवनी यांचं म्हणणं आहे.

तसंच, त्यांना निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी मिळाली नाही. आम्हाला त्याच लोकसभा निवडणुकीपूर्वी देश सोडावा असं मोदी सरकारतर्फे सांगण्यात आलं, ज्याला पंतप्रधान मोदी लोकशाहीची जननी असं म्हणतात, असा आरोप अवनी डायस यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे मला माझ्या कामात अनेक अडथळे आले. हे जाणूनबुजून करण्यात आलं असून मोदी सरकारमुळेच मला हा देश सोडावा लागत असल्याचंही अवनी डायस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने केलेल्या हस्तक्षेपामुळे व्हिसा दोन महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र, ही माहिती त्यांना अवघ्या 24 तास आधी देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केलेत. पहिलं म्हणजे 2019 ला स्थापन झालेली महाविकासआघाडी 2014 मध्येच बनवण्याचं ध्येय...
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान
जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाची कारवाई, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
सगेसोयर्‍याची अंमलबजावणी न केल्यास समाजाला निवडणुकीत उतरविणार- मनोज जरांगे पाटील
कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी