50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बॉम्बगोळा

50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बॉम्बगोळा

राज्य सरकारच्या मुर्दाडपणामुळे महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा पडला आहे. राज्यात 50 हजार कोटींची गुंतवणूक घेऊन येत असलेला ‘गेल’चा प्रकल्प मध्य प्रदेशात गेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर किंवा कोकणातील दाभोळ येथे येणारा हा प्रकल्प मध्य प्रदेशातील सिहोर येथे उभारण्यात येणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक राज्यातून बाहेर गेलीच कशी याचे उत्तर मिंध्यांनी द्यावे असा बॉम्बगोळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टाकला आहे.

राज्यात मिंध्यांचे सरकार आल्यापासून उद्योग क्षेत्राला नजरच लागली आहे. तब्बल एक लाख कोटींची गुंतवणूक असलेला वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातने पळवला. त्यापाठोपाठ एअरबस टाटा, ड्रग बल्क पार्क आदी प्रकल्पही गुजरातला गेले. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उद्योग गुजरातला पळवले जात असताना मिंधे सरकार हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसले होते. आता गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचा राज्यात येऊ घातलेला 50 हजार कोटींचा प्रकल्प मध्य प्रदेशातील सिहोर येथे गेला असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारी गॅस कंपनीकडून करण्यात येणारी आतापर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या प्रकल्पात दरवर्षी 1.5 दशलक्ष टन इथेन क्रॅकिंग करण्यात येणार आहे. पेट्रोलियम पदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर हा गौप्यस्फोट केला असून, मिंधे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी हा प्रकल्प उत्सूक होता. त्यासाठी त्यांनी तयारीही चालवली होती. मग अचानक असे काय घडले की महाराष्ट्राच्या वाटेवर असलेल्या या प्रकल्पाने मध्य प्रदेशातील सिहोरची वाट धरली. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा रोजगार असा सहजरीत्या बाहेर कसा काय गेला, याचे उत्तर मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी द्यावे, असे आव्हान दानवे यांनी दिले आहे.

मिंधे सरकार, उत्तर द्या
‘गेल’ने प्रकल्पाच्या जागेसाठी विचारणा केली होती का?
‘गेल’ने महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचे का नाकारले?
‘गेल’सरकारी कंपनी आहे, मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का?
अंबादास दानवे यांनी हे तीन प्रश्न मिंधे सरकारला विचारले असून, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे, असे ठणकावले आहे.

डॉ. कराडांचे प्रयत्न अपयशी
गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी छत्रपती संभाजीनगरात होणार्‍या शेंद्रा-बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ‘गेल’ तसेच उद्योग खात्याच्या उच्चपदस्थांशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तब्बल 12 बैठका केल्या. प्रकल्प येण्याच्या तयारीत असतानाच अचानक मध्य प्रदेशातील सिहोरकडे गेला. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गेल्याबद्दल डॉ. कराड यांनी चकार शब्दही काढलेला नाही, हे विशेष!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया पीएम मोदी – मेलोनी यांच्या ‘मलोडी’ व्हिडीओवर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील...
सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
मासिक पाळीचा ‘तो’ सीन शूट करताना कशी होती अविका गौरची अवस्था? म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला विचारलं…’
बिग बॉसनंतर अंकिता लोखंडेकडून डॅमेज कंट्रोल सुरू; सासूसोबत मंदिरातील व्हिडीओ पाहून कमेंट्सचा वर्षाव
बिग बॉसची नाती कुठे टिकतात? करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण
ELON MUSK नंतर राहुल गांधी यांचे EVM संदर्भात ट्वीट, वायकर यांचा संदर्भ देऊन म्हणाले, EVM हा एक ब्लॅक बॉक्स…
सांगलीतील ओन्ली अज्या टोळीला मोक्का