नगरमध्ये भाजपचा मनसेला ठेवले दूर; विखेंचा उमेदवारी अर्ज भरताना मनसेने फिरवली पाठ

नगरमध्ये भाजपचा मनसेला ठेवले दूर; विखेंचा उमेदवारी अर्ज भरताना मनसेने फिरवली पाठ

भाजपला मनसेने पाठिंबा दिला आहे. तसेच भाजपने मनसेला नगरमध्ये लांबच ठेवल्याचे दिसून आले आहे. विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेला निमंत्रण मनसेला निमत्रणच देण्यात आले नव्हते. त्यामुळे याबाबतच्या चर्चा नगरमध्ये होत आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर विखे किंवा भाजपकडून आम्हाला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे आमचा एकही पदाधिकारी तिथे गेला नाही, असे त्यांनी सांगितले.

नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वजण व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वांची नावे घेऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत केले. त्यावेळी जिल्हाध्यक्षांचा उल्लेख त्यांनी केला. मात्र, ते व्यासपीठावरच हजरच नव्हते, असे उघड झाले आहे. त्यामुळे याचीही नगरच्या राजकारणात चर्चा होत आहे.

मनसेने भाडपला पाठिंबा देत महायुतीचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेला बोलवण्यात आले नाही. त्यामुळे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला त्यांच्याकडून कोणतीही निमंत्रण आलेले नाही. त्यांची यंत्रणा नेमकी काय काम करते, हा खरा प्रश्न आहे, असे मनसेच्या एका पदाधिऱ्याने सांगितले. आम्हाला निमंत्रणच नसल्याने आमचा एकही पदाधिकारी या सभेला हजर नव्हता, असे ते म्हणाले. भाजपला पाठिंबा दिल्यानंतर अशा पद्धतीने वागणूक मिळाल्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असल्याची चर्चा नगरमध्ये होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा … तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचा भाजपला आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून...
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान