‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेता फिरोज खान यांचे निधन

‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेता फिरोज खान यांचे निधन

भाबीजी घर पर हैं… या बहुचर्चित हिंदी मालिकेतील अभिनेता फिरोज खान यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांची हुबेहूब नक्कल करून चाहत्यांना खळखळून हसवणारे फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 23 मे रोजी सकाळी त्यांनी बदायूंमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. फिरोज खान यांच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FIROZ KHAN (@ifirozkhanofficial)

फिरोज खान यांनी फक्त टीव्हीवरच नव्हे तर चित्रपटांमध्येही काम केले आहे. एक उत्तम मिमिक्री मॅन आणि बिग बी यांच्या नक्कल करण्यासाठी ते ओळखले जायचे. अमिताभ बच्चन यांची नक्कल करुन प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. तसेच हिंदी टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘भाबीजी घर पर हैं!’, ‘जिजा जी छत पर हैं’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टान पलटन’ आणि ‘शक्तिमान’मध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

फिरोज खान यांनी 4 मे रोजी बदायूं क्लब येथे मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमानंतर लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. फिरोज खान सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. अभिनेत्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने अनेक चित्रपट कलाकारांची नक्कल केली. ज्यात दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचा समावेश आहे. अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक