Breaking : डोंबिवली MIDC तील एका कंपनीत भीषण स्फोट, 5 ते 6 कामगार जखमी

Breaking : डोंबिवली MIDC तील एका कंपनीत भीषण स्फोट, 5 ते 6 कामगार जखमी

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील परिसरात एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला असून आसपासच्या अन्य दोन ते तीन कंपन्यांना देखील आगीची झळ पोहोचल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील रहिवासी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत कंपनीतील पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत तर परिसरातील काही नागरिकांना देखील काचा फुटून जखमा झाल्या आहेत. या जखमींचा निश्चित आकडा अद्याप कळालेला नाही.

पावणे दोनच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे प्रोबेस कंपनीच्या भीषण स्फोटाची आठवण डोंबिवलीकरांना झाली आहे. या स्फोटात प्रंचड नुकासान झालं होतं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक