अदानींच्या कोळसा घोटाळा चौकशीसाठी जेपीसी नेमणार -काँग्रेस

अदानींच्या कोळसा घोटाळा चौकशीसाठी जेपीसी नेमणार -काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिय मित्र गौतम अदानी यांनी देशातील सर्वात मोठा कोळसा घोटाळा केला. या मेगा मोदानी घोटाळ्यातील उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटीला शांत ठेवण्यासाठी किती टेम्पो लागले, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येताच संयुक्त संसदीय समिती नेमण्यात येईल असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

अदानी समूहाने तामीळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन पंपनी या सरकारी मालकीच्या वीज वितरण पंपनीसोबत केलेल्या व्यवहारात कमी दर्जाच्या कोळशाची किंमत वाढवून लावण्यात आली. हा कोळसा तीनपट किंमतीत विकला आणि देशाचे हजारो कोटी लुटले. याची किंमत सर्वसामान्य जनतेने विजेचे भरमसाट बिल भरून मोजावी लागली. 4 जूननंतर इंडिया आघाडीचे सरकार या महाघोटाळ्याची चौकशी करून जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैशाचा हिशेब घेईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य ‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’
‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अमृताची आई-बाबांसोबत लंडन ट्रीप; म्हणाली, माझा सुपरहिरो आणि त्याची सुपर पॉवर…
काही महिन्यात नवी दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो; आदित्य ठाकरेंनी भाजपवर डागली तोफ
EVM हा देशातील ब्लॅक बॉक्स; विश्वासार्हतेबाबत राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
युट्यूबमधून मिळणारी माझी सर्व कमाई दान करणार; ऋषभ पंतचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांनी केलं कौतुक