<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/239/shivaji-adharao-patil" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>Shivaji Adharao Patil - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/239/rss</link>
                <description>Shivaji Adharao Patil RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(1).jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :</strong> लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>
<p>“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.</p>
<p>माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 12:53:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%281%29.jpg"                         length="139671"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला</title>
                                    <description><![CDATA[<p>मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-08-at-3.08.50-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>घोडेगाव :</strong> मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.</p>
<p>शिरूर लोकसभा मतदार संघात पाटील यांच्या प्रचारासाठी घोडेगाव, ता. आंबेगाव, पुणे येथे माहायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आढळराव बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.</p>
<p>शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, कोणतीही कामे एक दोन महिन्यात होत नाहीत. माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते हे कोकणातील असून सुद्धा कोकण रेल्वे सुरू व्हायला 28 वर्ष लागली. अन् ह्यांचा पोपट म्हणतो दोन महिन्यात प्रकल्प सुरू होतो. आजवर या भागात झालेले प्रकल्प हे माझ्या 15 वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आहे. आगामी काळात शिरूर लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रकल्पाचे काम मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कमीत कमी 25 हजार कोटींची गरज आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी चाकणच्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर निवडून गेलेल्या 'या' खासदाराने नंतर त्या वाहतूक कोंडीकडे वळूनही पाहिले नाही. वाघोली, शिकरापूर आणि लोणी काळाभोरच्या ही वाहतुकीचा प्रश्न तसाच आहे. हा रास्ते वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ही मोठ्या निधीची गरज आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असेल तरच हे प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.</p>
<p>पुढे बोलताना ते म्हणाले, मी निष्ठे बद्दल, स्वाभिमानाबद्दल बोलत नाही तर मी विकासावर बोलतो. मात्र तो फक्त निष्ठे  बद्दल बोलतो. ज्या व्यक्तीने आपल्या कारकिर्दीत पाच पक्ष बदलले त्याला निष्ठे  बद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे. राजकारणात निष्ठा फक्त जनतेशी ठेवली पाहिजे. त्याच निष्ठेमधून कोणतेही पद नसताना मी केंद्रातून निधी आणला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D</guid>
                <pubDate>Wed, 08 May 2024 15:39:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-08-at-3.08.50-pm.jpeg"                         length="120780"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Shirur Lok Sabha Election: बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..! </title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(9).jpg" alt=""></a><br /><p><strong>शेती-माती-संस्कृतीसाठी बैलगाडा प्रेमी, शेतकऱ्यांची एकजूट करुया</strong></p>
<p><strong>पिंपरी । </strong>महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. </p>
<p>शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून ३७ हजाराहून अधिक मतांची आघाडी आढळराव पाटील यांना मिळाली होती. यावेळी महायुतीच्या माध्यमातून १ लाख मतांचे ‘लीड’ देण्याचा निर्धार आमदार लांडगे यांनी केला आहे. </p>
<p>आमदार लांडगे म्हणाले की, केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात दि. ११ जुलै २०११ रोजी बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम २२ (२) नुसार बैल या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्याच्या यादीत करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने देशभरात शर्यतींवर बंदी केली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपा महायुती सरकार आले. तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.  ११ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना आणि महायुती सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा लक्षा यशस्वी झाला. </p>
<blockquote class="format1">
<blockquote class="format2">
<p>शिरुर लोकसभा मतदार संघातील बैलगाडा मालक, शेतकरी, बैलगाड प्रेमी, बळीराजाला आम्ही आवाहन करतो की, बैलांची धावण्याची क्षमता अहवाल (रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स) आणि सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती व खर्चाची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने घेतली. विधीमंडळ सभागृहात कायदा केला. तो कायदा महायुती सरकारने मंजूर केला. त्या महायुती सरकारच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना साथ द्यावी आणि महायुतीला निवडून द्यावे.</p>
<p><strong>– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.</strong></p>
</blockquote>
</blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti</guid>
                <pubDate>Tue, 07 May 2024 18:07:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%289%29.jpg"                         length="237014"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन </title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13078/%22if-you-want-to-complete-your-dream-project---%22-adal-rao-s-appeal-to-the-voters"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(2).jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर : </strong>शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.</p>
<p>पाच कंदील चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा झाली यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. </p>
<p>यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत   विकासपुरुष नरेंद्र मोदी  आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत.</p>
<p>गेल्या निवडणूकीत मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो, मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे.   2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले  </p>
<p><br />या निवडणुकीनंतर शिरूरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्यक्रम  असल्याचेही आढळराव पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे अशी विनंती पाटील यांनी केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13078/%22if-you-want-to-complete-your-dream-project---%22-adal-rao-s-appeal-to-the-voters</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13078/%22if-you-want-to-complete-your-dream-project---%22-adal-rao-s-appeal-to-the-voters</guid>
                <pubDate>Tue, 07 May 2024 13:34:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%282%29.jpg"                         length="106320"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Shirur Lok Sabha Election : शिरुर लोकसभा मतदार संघात भाजपाचा ‘‘मास्टर ट्रोक’’</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला असून, मतदार संघातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13020/shirur-lok-sabha-election-shirur-lok-sabha-voters-in-the-bjp---master"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-06-at-3.35.24-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा भाजपा प्रवेश</strong></p>
<p><br /><strong>पुणे । </strong>शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘‘मास्टर स्ट्रोक’’ मारला असून, मतदार संघातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कवडे यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. </p>
<p>भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या समन्वयाने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश कवडे यांनी हातात ‘कमळ’ घेतले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची शिरुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कवडे यांनी भाजपाची पताका खांद्यावर घेतली. </p>
<p>याबाबत आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र ओझर विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी आज राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आणि केंद्र व राज्यातील महायुतीची विकासात्मक धोरणाला जनसामान्यांतून प्रतिसाद मिळत आहे. </p>
<p>शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा ‘‘श्रीगणेशा’’ निश्चितपणे महायुतीचे उमेदवारशिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शुभसंकेत ठरेल, असा विश्वास वाटतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि मित्र पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे. </p>
<p><br /><strong>आढळरावांच्या विजयासाठी भाजपा मैदानात…</strong></p>
<p>शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गणेश कवडे काम करीत होते. जुन्नर तालुक्यातील युवा चेहरा आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख आहे. तसेच, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महायुतीच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर लढत आहेत. मात्र, ‘‘घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत…’’ असा नारा देत भाजपा आढळरावांच्या विजयासाठी मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘कट्टर समर्थक’ असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. त्याद्वारे भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. अष्टविनायक गणपतीपैकी  ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि रांजनगावचा महागणपती ही तीर्थक्षेत्र शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आहेत. पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा महायुतीला होईल, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13020/shirur-lok-sabha-election-shirur-lok-sabha-voters-in-the-bjp---master</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13020/shirur-lok-sabha-election-shirur-lok-sabha-voters-in-the-bjp---master</guid>
                <pubDate>Mon, 06 May 2024 15:47:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-06-at-3.35.24-pm.jpeg"                         length="79229"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“५ वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर”, फडणवीसांनी कोल्हेंना दिला इशारा</title>
                                    <description><![CDATA[<p>देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/punawale.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. </p>
<p>पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी आढळराव पाटलांचं कौतूकही केलं. ते म्हणाले की, महेश दादा असो किंवा आढळराव पाटील असो. त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी खुप प्रयत्न केलेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी काहीचं झालं नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री असतांना तो प्रश्न मार्गी लावला. सरकार आलं आणि बैलगाडी शर्यंत सुरू केली. असं म्हणत शेतकऱ्यांना काय हवंय, सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढळराव पाटील आहे. असेही फडणवीस म्हणाले. </p>
<p>जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेने देखील आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग मी काढला. जागा जरी राष्ट्रवादीला गेली तर उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ असं दोघांना सांगितलं. तिथे पक्ष बदलला नाही. आम्ही एका विचाराने सोबत आलो आहोत.  याआधी पालघरमध्ये आम्ही ठाकरेंना उमेदवारही दिला आणि जागी ही दिला. त्यानंतर तो उमेदवार देखील आम्ही निवडून आणला. एका विचारात काम करत असतांना आम्ही पक्ष बदलला नाही. त्याठिकाणी आम्ही ठरवून केलं आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. </p>
<p>पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्या चांगलाच समाचार घेतला. शिवाजीराव आढळराव पाटलांवर पक्ष बदलण्याचा आरोप केला जात आहे. परंतु  विरोधकांकडून टिका होत असेल तर समोरच्या उमेदवारांनी किती पक्ष बदलला. किती निष्ठा जपली. गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते ? आता कसे थांबले. ? याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर  त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल. असा इशाराही त्यांनी दिला. </p>
<p>आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे  एका गोष्टीत ते सरस आहेत. आढळराव पाटील नाटककार नाहीत. त्यांना नाटक जमत नाहीत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं. हसता येतं. बोलता येतं चुगलेबाजी करता येतं. असं म्हणत  लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा बघायला जातात. परंतु नाटक जर प्लॉप झालं तर लोक परत जात नाहीत. असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.</p>
<p>दरम्यान,  पाच वर्ष हा व्यक्ती मतदारसंघात फिरकला नाहीत. आता ते गावात जातात. त्यावेळी लोकं शिव्या वगैरे देत नाहीत. त्यांना बोलवतात. सत्कार करतात. हार घालतात. मग विचारतात पाच वर्षे कुठे होते ? ही निवडणूक देशाची असून आढळराव सारखा एक व्यक्ती मोदींसोबत ज्यावेळी जाईल. त्यावेळी आपल्या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe</guid>
                <pubDate>Mon, 06 May 2024 15:26:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/punawale.jpg"                         length="131623"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12098/bhosari-gave-strong-wrestlers-to-maharashtra--bhosari-s-yatra-festival-is-a-sports-festival-itself--adha-rao-patil"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-28-at-4.19.32-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :</strong> शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.</p>
<p>यावेळी आढळरावांना कुस्तीप्रेमी नागरिकांशी संवाद साधताना म्हंटले की, भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा. महाराष्ट्राला अनेक दमदार कुस्तीपटू भोसरी गावाने दिले आहे. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे. मातीशी असलेली घट्ट नाळ भोजापुर नागरीने आजही टिकवून ठेवली आहे, याचा अभिमान आहे म्हणूनच भोसरीची यात्रा म्हणजे सर्व नागरिकांसाठी क्रीडा पर्वणीच असते.</p>
<div class="google-auto-placed ap_container"><ins class="adsbygoogle adsbygoogle-noablate">
<div>याप्रसंगी आमदार महेश दादा लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राकाँपा अजित गव्हाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजू फुके, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय, शिवसेना समन्वयक आबा लांडगे, भालेराव, नगरसेवक जालिंदर शिंदे, नगरसेवक नितीन शेठ लांडगे, मुंबई महापौर केसरी कोच अजय लांडगे, वस्ताद रंगनाथ साधू फुगे, उत्सव कमिटी प्रमुख पंडित गवळी, भानुदास फुगे, शामराव फुगे, नारायण गव्हाणे, शिवाजी लांडगे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.</div>
</ins></div>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12098/bhosari-gave-strong-wrestlers-to-maharashtra--bhosari-s-yatra-festival-is-a-sports-festival-itself--adha-rao-patil</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12098/bhosari-gave-strong-wrestlers-to-maharashtra--bhosari-s-yatra-festival-is-a-sports-festival-itself--adha-rao-patil</guid>
                <pubDate>Sun, 28 Apr 2024 19:05:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-28-at-4.19.32-pm.jpeg"                         length="83995"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'माझ्या पंधरा वर्षांच्या कामाचा हिशोब मी जनतेला दिलाय'; आढळराव पाटील </title>
                                    <description><![CDATA[<p>मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-3.41.25-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी :</strong> मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. </p>
<p>अहमदनगर महामार्ग, नाशिक महामार्ग, तसेच सोलापूर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या प्रश्नासाठी मी खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला त्यांनी त्याबाबत योग्य नियोजनही केले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीला सामोरे जातोय. सदैव जनतेसाठी उपलब्ध राहून जनतेची कामे करण्याची माझी गॅरंटी आहे. असेही आढळराव पाटील म्हणाले. </p>
<p>भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे तुमच्या प्रचारात दिसत नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर आढळराव पाटील यांनी सांगितले कि, आमदार महेश लांडगे दररोज माझ्या संपर्कात आहेत, त्यांचा प्रचार, बैठका दिवसरात्र सुरु असून त्यांचे सर्व सहकारी सक्रियपणे प्रचारात सहभागी होत आहेत असे आढळराव पाटील म्हणाले. सध्या उन्हाळा वाढला असला तरीही जनतेसाठी ऊन, वारा, पावसाची आम्ही कधी तमा बाळगली नाही, नेहमी लोकांसाठी धावून गेलो. हि माझी शेवटची निवडणूक आहे या आवाहनामुळे कोल्हेंना वाईट वाटले असेल किंवा ते भावून झाले असतील तर मी पुन्हा निवडणूक लढवीन.. मुळात कोल्हे यांच्यात 'मी' पणा दिसतोय, निवडणूक त्यांच्या हातातून निसटल्याची हि लक्षणे आहेत असा टोला आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला</p>
<p>प्रचारादरम्यान, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ट्रस्टचे मा. नगरसेवक वसंत बोराटे, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे, गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कविता अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अभिमन्यू लांडगे, मा. शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, राष्ट्रवादी उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर, बबन आल्हाट, दैतुरे मामा, आशा मिसाळ, रोहिदास हवालदार, उद्योजक प्रदीप अल्हाट, उद्योजक संदीप अल्हाट, धर्माजी अल्हाट, हिरामण अल्हाट, बाबासाहेब अल्हाट, अर्जुन बनकर, राजू शेठ सस्ते, रामदास बोराटे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil</guid>
                <pubDate>Sat, 20 Apr 2024 15:50:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-3.41.25-pm.jpeg"                         length="295339"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        