<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/225/amol-kolhe" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>Amol Kolhe - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/225/rss</link>
                <description>Amol Kolhe RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल!</title>
                                    <description><![CDATA[<p>राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.</p>
<p> </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13533/sharad-pawar-s-self-goal-on-the-path-of--mahayuti--candidates"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/96166201.webp" alt=""></a><br /><p>`<strong>पुणे </strong>: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.</p>
<p>शिरुर मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाचे डॉ. अमोल कोल्हे  यांच्या विरोधात लढत असलेले शिवाजीराव आढळराव तसेच मावळमध्ये उबाठा गटाच्या विरोधात लढत असलेले श्रीरंग बारणे यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांनाही अर्थातच शरद पवार यांच्या या उद्‌गाराचे होकारात्मक पडसात जाणवतील.</p>
<p>गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले होते की दि. ४ जूनच्या निकालानंतर महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष पूर्णपणे संपतील. या त्यांच्या भाकितानंतर लगेचच शरद पवार यांनी जे उद्‌गार काढले ते देखील धक्कादायक मानले जातात. ते दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवार यांचा गट  आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा गट हे स्पष्ट झाले आहे.</p>
<p>शरद पवार यांनी हा खुलासा करताना आपल्याबरोबर उद्धव ठाकरे यांचा गटही  येईल, असेही सांगून टाकले असल्याने शिवसेनेच्या उबाठा गटात एकच खळबळ उडाली आहे.</p>
<p>एकीकडे महायुतीचा झंझावाती प्रचार आणि दुसरीकडे विरोधकांची उडणारी धूळधाण पाहता आणि पुणे जिल्ह्यापुरता विचार करता शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे आणि मुरलीधर मोहोळ या उमेदवारांना अनुकूल असेच<br />शरद पवार यांचे वक्तव्य मानले जाते.</p>
<blockquote class="format2">
<p>दि.४ जूनच्या निकालानंतर देशातील छोटे प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील. असे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचाही त्याला फारसा विरोध नसेल. आमची आणि कॉंग्रेसची विचारसरणी साधारण एकच असल्यामुळे हे सहज शक्य आहे. असे झाल्यास कॉंग्रेसचे नेते सुद्धा या भूमिकेचे स्वागतच करतील.<br /> -<strong>  शरद पवार, ज्येष्ठ नेते</strong></p>
</blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13533/sharad-pawar-s-self-goal-on-the-path-of--mahayuti--candidates</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13533/sharad-pawar-s-self-goal-on-the-path-of--mahayuti--candidates</guid>
                <pubDate>Sat, 11 May 2024 11:55:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/96166201.webp"                         length="29268"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान </title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/your-paragraph-text-(7).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>
<p>“राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.</p>
<p>दरम्यान, अमोल कोल्हे यांची घोषणा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका होत आहे. मोठ्या अपेक्षाने कोल्हे यांना वेळी लोकांनी निवडून दिले होते, मात्र त्यांनी पाच वर्षात मतदारसंघाकडे पाठ फिरवली. लोकांची तसेच मतदारसंघात विकास कामे केली नाही. आता केवळ पराभव दिसू लागल्याने ते अभिनय सोडण्याची भाषा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</guid>
                <pubDate>Fri, 10 May 2024 16:37:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/your-paragraph-text-%287%29.jpg"                         length="104310"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(1).jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :</strong> लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>
<p>“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.</p>
<p>माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 12:53:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%281%29.jpg"                         length="139671"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला</title>
                                    <description><![CDATA[<p>मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-08-at-3.08.50-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>घोडेगाव :</strong> मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही.  जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.</p>
<p>शिरूर लोकसभा मतदार संघात पाटील यांच्या प्रचारासाठी घोडेगाव, ता. आंबेगाव, पुणे येथे माहायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आढळराव बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.</p>
<p>शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, कोणतीही कामे एक दोन महिन्यात होत नाहीत. माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते हे कोकणातील असून सुद्धा कोकण रेल्वे सुरू व्हायला 28 वर्ष लागली. अन् ह्यांचा पोपट म्हणतो दोन महिन्यात प्रकल्प सुरू होतो. आजवर या भागात झालेले प्रकल्प हे माझ्या 15 वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आहे. आगामी काळात शिरूर लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रकल्पाचे काम मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कमीत कमी 25 हजार कोटींची गरज आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी चाकणच्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर निवडून गेलेल्या 'या' खासदाराने नंतर त्या वाहतूक कोंडीकडे वळूनही पाहिले नाही. वाघोली, शिकरापूर आणि लोणी काळाभोरच्या ही वाहतुकीचा प्रश्न तसाच आहे. हा रास्ते वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ही मोठ्या निधीची गरज आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असेल तरच हे प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.</p>
<p>पुढे बोलताना ते म्हणाले, मी निष्ठे बद्दल, स्वाभिमानाबद्दल बोलत नाही तर मी विकासावर बोलतो. मात्र तो फक्त निष्ठे  बद्दल बोलतो. ज्या व्यक्तीने आपल्या कारकिर्दीत पाच पक्ष बदलले त्याला निष्ठे  बद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे. राजकारणात निष्ठा फक्त जनतेशी ठेवली पाहिजे. त्याच निष्ठेमधून कोणतेही पद नसताना मी केंद्रातून निधी आणला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13234/%E2%80%9Cin-the-last-15-years-i-have-worked--and-in-the-last-5-years-he-has-only-acted-in-work%E2%80%9D</guid>
                <pubDate>Wed, 08 May 2024 15:39:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-08-at-3.08.50-pm.jpeg"                         length="120780"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“५ वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर”, फडणवीसांनी कोल्हेंना दिला इशारा</title>
                                    <description><![CDATA[<p>देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/punawale.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. </p>
<p>पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी आढळराव पाटलांचं कौतूकही केलं. ते म्हणाले की, महेश दादा असो किंवा आढळराव पाटील असो. त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी खुप प्रयत्न केलेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी काहीचं झालं नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री असतांना तो प्रश्न मार्गी लावला. सरकार आलं आणि बैलगाडी शर्यंत सुरू केली. असं म्हणत शेतकऱ्यांना काय हवंय, सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढळराव पाटील आहे. असेही फडणवीस म्हणाले. </p>
<p>जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेने देखील आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग मी काढला. जागा जरी राष्ट्रवादीला गेली तर उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ असं दोघांना सांगितलं. तिथे पक्ष बदलला नाही. आम्ही एका विचाराने सोबत आलो आहोत.  याआधी पालघरमध्ये आम्ही ठाकरेंना उमेदवारही दिला आणि जागी ही दिला. त्यानंतर तो उमेदवार देखील आम्ही निवडून आणला. एका विचारात काम करत असतांना आम्ही पक्ष बदलला नाही. त्याठिकाणी आम्ही ठरवून केलं आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. </p>
<p>पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्या चांगलाच समाचार घेतला. शिवाजीराव आढळराव पाटलांवर पक्ष बदलण्याचा आरोप केला जात आहे. परंतु  विरोधकांकडून टिका होत असेल तर समोरच्या उमेदवारांनी किती पक्ष बदलला. किती निष्ठा जपली. गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते ? आता कसे थांबले. ? याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर  त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल. असा इशाराही त्यांनी दिला. </p>
<p>आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे  एका गोष्टीत ते सरस आहेत. आढळराव पाटील नाटककार नाहीत. त्यांना नाटक जमत नाहीत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं. हसता येतं. बोलता येतं चुगलेबाजी करता येतं. असं म्हणत  लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा बघायला जातात. परंतु नाटक जर प्लॉप झालं तर लोक परत जात नाहीत. असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.</p>
<p>दरम्यान,  पाच वर्ष हा व्यक्ती मतदारसंघात फिरकला नाहीत. आता ते गावात जातात. त्यावेळी लोकं शिव्या वगैरे देत नाहीत. त्यांना बोलवतात. सत्कार करतात. हार घालतात. मग विचारतात पाच वर्षे कुठे होते ? ही निवडणूक देशाची असून आढळराव सारखा एक व्यक्ती मोदींसोबत ज्यावेळी जाईल. त्यावेळी आपल्या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13019/how-many-facebook-posts-have-been-posted-in-5-years--where-were-you-going--if-the-truth-comes-out%E2%80%9D--fadnavis-warned-the-kolhe</guid>
                <pubDate>Mon, 06 May 2024 15:26:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/punawale.jpg"                         length="131623"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बारामतीच झालं, आता शिरूरला जायचं! : अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंचं टेंशन..!</title>
                                    <description><![CDATA[<p>बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12923/baramati-is-done--now-to-go-to-shirur----ajit-pawar-increased-amol-kolhe-s-tension"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/amol-kolhe-ajit-pawar.jpg" alt=""></a><br /><p><strong>बारामती :</strong> बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. </p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. येथे महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात आहेत. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार येथून मैदानात उतरवायला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते इकडेच दिसून आले. मात्र आता अजित पवारांनी शिरूरमध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. </p>
<p><strong>मी विकासावर बोलतो रडीचा डाव खेळत नाही</strong></p>
<p>सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. "मी सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना सांगत होतो की शेवटच्या सभेमध्ये रडीचा डाव खेळला जाईल. आज आमचा पट्टा रडला मात्र मी विकास कामांवर मत मागतो भावनिक राजकारण करत नाही", अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12923/baramati-is-done--now-to-go-to-shirur----ajit-pawar-increased-amol-kolhe-s-tension</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12923/baramati-is-done--now-to-go-to-shirur----ajit-pawar-increased-amol-kolhe-s-tension</guid>
                <pubDate>Sun, 05 May 2024 20:52:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/amol-kolhe-ajit-pawar.jpg"                         length="50505"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विद्यमान खासदार ‘पार्टटाइम राजकारणी..’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला</title>
                                    <description><![CDATA[<p>गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे. अशातच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका केली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/images1.jpg" alt=""></a><br /><p>बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले</p>
<p><strong>बारामती :</strong> बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. </p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. येथे महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात आहेत. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार येथून मैदानात उतरवायला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते इकडेच दिसून आले. मात्र आता अजित पवारांनी शिरूरमध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. </p>
<p><strong>मी विकासावर बोलतो रडीचा डाव खेळत नाही</strong></p>
<p>सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. "मी सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना सांगत होतो की शेवटच्या सभेमध्ये रडीचा डाव खेळला जाईल. आज आमचा पट्टा रडला मात्र मी विकास कामांवर मत मागतो भावनिक राजकारण करत नाही", अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal</guid>
                <pubDate>Sun, 05 May 2024 13:27:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/images1.jpg"                         length="6974"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'...अन्यथा कोल्हेंनी जाहीर माफी मागून निवडणूकीतून बाहेर पडावे'; आढळरावांनी कोल्हेंना खडसावले</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/shivajirao-adharao-patil-amol-kolhe.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर :</strong> शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.</p>
<p>ओतूर येथील सभेत, कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी आढळरावांनी संसदेत संरक्षण खात्याविषयी ७५ प्रश्न विचारल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चौफेर झोडपले. ते म्हणाले की, मी माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागून कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना ठणकावले. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नसून हार्डवेअरची आहे. मुळात पाच वर्षे गायब राहून निवडणूक आल्यावर कांदा प्रश्नावर कोल्हेंनी फक्त ओरड केली, पण त्यासाठी काय केलं, सरकारकडे पाठपुरावा केला का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 17:37:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/shivajirao-adharao-patil-amol-kolhe.jpg"                         length="90986"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'अमोल कोल्हे मतदारांना गृहीत धरून वागत आहेत'; आढळरावांचा टोला</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(2).jpg" alt=""></a><br /><p><strong>चाकण : </strong>शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.</p>
<p>शिरूर लोकसभेसाठी मनसेच्या वतीने चाकणच्या आंबेठाण चौकात मेळावा झाला. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, सरचिटणीस अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, सभापती कैलास लिभोरे, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, सचिन चिखले, संदीप पवार, मनोज पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.</p>
<p>दरम्यान, मनसैनिक शिरूर लोकसभेत तन-मन-धनाने जिवाचं रान करून आढळरावांसाठी मतदान करून घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत आहेत. पिंपरीसाठी माजी नगरसेवक सचिन चिखले, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, हवेलीची धुरा किरण माने, चेतन चौधरी, शिरूरची धुरा रवी मुरादे, नाना लांडे, किरण गव्हाणे, आंबेगावची धुरा बाबू बाणखेले, आशिष शिंदे, किरण गव्हाणे, खेडची धुरा मंगेश सावंत, सनी लोणकर, नवनाथ लोखंडे सांभाळत आहेत. विद्यार्थी सेनेचा ३०० मनसैनिकांचा मेळावा खेड तालुक्यात झाला आहे. शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी या सर्वच भागातले मनसैनिक आढळरावांच्या प्रचारासाठी तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, अशी माहिती विद्यानंद मानकर यांनी दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 17:17:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%282%29.jpg"                         length="150036"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’; अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं!</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/images.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.</p>
<p>“गेली ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप अमोल कोल्हे करू लागले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं”, असं खुलं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर कांदाभावावरुन धारेवर धरलं होतं. त्यावर उत्तर देताना आढळरावांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.</p>
<h6><strong>अमोल कोल्हे काय म्हणाले होते?</strong></h6>
<p>दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. ‘काहींनी १५ वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे’, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळराव पाटलांवर केला होता.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena</guid>
                <pubDate>Thu, 02 May 2024 19:23:44 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/images.jpg"                         length="6077"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12441/questioning-of-dilip-valse-patil-in-the-hospital-by-shivajirao-adharao-patal"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-01-at-4.29.44-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.</p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी गटातील आमदारांनी आढळरावांच्या प्रचारासाठी चांगल्याच बैठका सुरू केल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मंत्री दिलीप वळसे पाटील दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.</p>
<p>यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची विचारपूस करण्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आपणा सर्वांना हे सांगताना अत्यंत समाधान वाटत आहे की, नामदार साहेबांची प्रकृती हळू हळू सुधारत आहे आणि लवकरच सक्रिय होऊन ते पुनः सगळा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. जनतेच्या आशिर्वादाने हे सगळं लवकरच शक्य होईल असा विश्वास साहेबांनी व्यक्त केल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.</p>
<p>दरम्यान, यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांच्यासोत माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण गिरे, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12441/questioning-of-dilip-valse-patil-in-the-hospital-by-shivajirao-adharao-patal</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12441/questioning-of-dilip-valse-patil-in-the-hospital-by-shivajirao-adharao-patal</guid>
                <pubDate>Wed, 01 May 2024 18:00:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-01-at-4.29.44-pm.jpeg"                         length="223718"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विद्यमान खासदारांविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश : हडपसरमध्ये आढळरावांचा हल्लाबोल</title>
                                    <description><![CDATA[<p>मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला.  विद्यमान खासदार  मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12242/outcry-in-the-minds-of-the-people-against-the-sitting-mps--in-hadapsar--the-attack-of-adha-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/amol-kolhe-adhalrao-patil.webp" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला.  विद्यमान खासदार  मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली. </p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे आदी उपस्थित होते. </p>
<p>यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, विद्यमान खासदार पाच वर्षात एकदाही मतदार संघात उपस्थित राहिले नाही. त्यांचा 80 टक्के निधी परत गेला आहे. शिवाय केंद्रातून एकही रुपयाचा निधी त्यांना आणता आला नाही. गावोगावी त्यांच्या विरोधातील फलक लावले आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12242/outcry-in-the-minds-of-the-people-against-the-sitting-mps--in-hadapsar--the-attack-of-adha-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12242/outcry-in-the-minds-of-the-people-against-the-sitting-mps--in-hadapsar--the-attack-of-adha-rao</guid>
                <pubDate>Mon, 29 Apr 2024 22:39:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/amol-kolhe-adhalrao-patil.webp"                         length="47006"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        