<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/219/shirur" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>Shirur - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/219/rss</link>
                <description>Shirur RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’साठी पाठपुरावा करणार! </title>
                                    <description><![CDATA[<p><strong> </strong>पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे  ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13569/will-pursue-for--red-zone-free-pimpri-chinchwad"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-11-at-2.12.05-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>आमदार महेश लांडगे यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद</strong></p>
<p><strong>पिंपरी । </strong>पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’चा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेकदा बैठक झाली. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. पण, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार होतील. त्यामुळे  ‘रेड झोनमुक्त पिंपरी-चिंचवड’ करण्यासाठी आम्ही पुन्हा संरक्षण विभाग आणि प्रधानमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत आणि हा प्रश्न सोडवणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. </p>
<p>शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त भोसरी येथील गावजत्रा मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीस बोलत होते.</p>
<p>आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात ‘रेड झोन’ बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शहरातील शास्तीकर, उपयोगकर्ता शुक्ल, कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, समाविष्ट गावांचा विकास, आंद्रा, भामा आसखेड पाणी प्रकल्प आदी ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील सर्व महत्वपूर्ण विषय मार्गी लागले. मोदी सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची ‘रेड झोन’ची मुक्तता करावी, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.</p>
<p>दरम्यान, २०१४ मध्ये राज्यात भाजपा प्रणित सरकार स्थापन झाल्यापासून भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या-ज्या वेळी जाहीर सभा केल्या. आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न आणि मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. त्या  सभांमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची त्यांनी पूर्तता केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा याच मैदानावर फडणवीस यांनी ‘रेडझोन’बाबत पिंपरी-चिंचवडकरांना आश्वासित केले आहे. त्यामुळे रेडझोनमधील मिळकतधारक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक अशा २ लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.</p>
<blockquote class="format1">
<p>पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २ लाख मिळकतधारक, लघु व मध्यम उद्योजक यांना दिलासा देण्यासाठी ‘रेड झोन’ हद्द कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार महेश लांडगे यांनी ‘रेड झोन मुक्त पिंपरी-चिंचवड’ची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.  ‘रेड झोन’चा तिढा सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी संरक्षण विभाग आणि मोदी सरकार निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेणार आहे.</p>
<p><strong> - शिवाजीराव आढळव पाटील.</strong></p>
</blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13569/will-pursue-for--red-zone-free-pimpri-chinchwad</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13569/will-pursue-for--red-zone-free-pimpri-chinchwad</guid>
                <pubDate>Sat, 11 May 2024 14:40:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-11-at-2.12.05-pm.jpeg"                         length="296747"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद</title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13481/%22whether-to-contest-elections-in-future-or-not--but-give-it-a-chance-this-time%22--emotional-appeal-to-voters-from-athar-rao-patal"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/your-paragraph-text-(8).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.</p>
<p>मागील काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील जोरदार प्रचार करतांना दिसत आहे. यातच आता अजित पवारांच्या सभा देखील शिरूरमध्ये होत आहेत. तर महायुतीचे सर्वच नेते, स्थानिक पदाधिकारी, आढळरावांसाठी झपाटून काम करतांना दिसत आहेत. यातच शेवटच्या टप्प्यात आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. </p>
<p>एका सभेत आढळराव पाटील म्हणाले की, खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.</p>
<p>पुढे बोलतांना ते असेही म्हटले की, भविष्यात निवडणूक लढेल की नाही लढेल काही सांगता येत नाही. पण यावेळेला संधी द्या. आपल्या भागात जी कामं अपुर्ण राहिली ती पुर्ण करण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही शिवरायांची भूमी आहे. क्रांतीकारांची भूमी आहे. ही शूरवीरांची भूमी आहे.  या भूमीतल्या वीराने एकदा निर्णय घेतला तर कोणाचे काय ऐकत नाही. त्यामुळे येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह घड्याळ आहे.  घड्याळ घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचा बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13481/%22whether-to-contest-elections-in-future-or-not--but-give-it-a-chance-this-time%22--emotional-appeal-to-voters-from-athar-rao-patal</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13481/%22whether-to-contest-elections-in-future-or-not--but-give-it-a-chance-this-time%22--emotional-appeal-to-voters-from-athar-rao-patal</guid>
                <pubDate>Fri, 10 May 2024 19:39:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/your-paragraph-text-%288%29.jpg"                         length="105900"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान </title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/your-paragraph-text-(7).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>
<p>“राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.</p>
<p>दरम्यान, अमोल कोल्हे यांची घोषणा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका होत आहे. मोठ्या अपेक्षाने कोल्हे यांना वेळी लोकांनी निवडून दिले होते, मात्र त्यांनी पाच वर्षात मतदारसंघाकडे पाठ फिरवली. लोकांची तसेच मतदारसंघात विकास कामे केली नाही. आता केवळ पराभव दिसू लागल्याने ते अभिनय सोडण्याची भाषा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</guid>
                <pubDate>Fri, 10 May 2024 16:37:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/your-paragraph-text-%287%29.jpg"                         length="104310"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार</title>
                                    <description><![CDATA[<p>राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13411/-fix-the-problem-of-drinking-water-forever---deputy-chief-minister-ajit-pawar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/your-paragraph-text-(6).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.</p>
<p>आळंदी येथे शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्यास महायुतीचे घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.</p>
<p>“तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली आत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल. ही देशाची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल”, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.</p>
<p>“आपण कोणत्याही प्रकारच्या शूटिंगला जाणार नाही. त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी तसेच मतदार संघातील उर्वरित विकास कामासाठी देणार आहे. आळंदी येथील देवस्थानच्या जागेत विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पुणे मेट्रो आळंदीपर्यंत आणण्यास प्रयत्न करायचे आहेत. मी मतदारसंघासाठी पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे, यामुळे निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही भूलथापांना  बळी पडू नये”, असे आवाहन आढळराव पाटलांनी मतदारांना केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13411/-fix-the-problem-of-drinking-water-forever---deputy-chief-minister-ajit-pawar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13411/-fix-the-problem-of-drinking-water-forever---deputy-chief-minister-ajit-pawar</guid>
                <pubDate>Fri, 10 May 2024 15:55:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/your-paragraph-text-%286%29.jpg"                         length="225691"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13370/-vijayi-sankalp--meeting-of-deputy-chief-minister-devendra-fadnavis-in-bhosari"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(6).jpg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी । </strong>शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.</p>
<p>भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसाठी जाहीर सभा आयोजित केली आहे. </p>
<p>भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शुक्रवारी, दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व घटकपक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली आहे. </p>
<p>आमदार लांडगे म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना ३७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी आम्ही महायुतीची वज्रमूठ तयार केली असून, भोसरीतून १ लाख मतांचे लीड देण्याचा संकल्प केला आहे. शिरुरमधील विजयाची सुरूवात भोसरीतून होईल, असा विश्वास आहे.</p>
<blockquote class="format2">
<p>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून महायुतीचा खासदार निवडून देण्याचा संकल्प आहे. भोसरी मतदार संघ हा या निवडणुकीत निर्णायक राहणार असून, मतांची आघाडी घेण्याकरिता जनसंवाद बैठकांच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील सर्व घटकांसोबत संवाद केला आहे. मोदी सरकारचे विकासाचे व्हीजन आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत जनजागृती केली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदार संघातील सकारात्मक वातावरण पाहता महायुतीची ‘विजयी संकल्प’सभा यशस्वी होईल, यात शंका नाही. <br /> </p>
<p><strong>- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.</strong></p>
</blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13370/-vijayi-sankalp--meeting-of-deputy-chief-minister-devendra-fadnavis-in-bhosari</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13370/-vijayi-sankalp--meeting-of-deputy-chief-minister-devendra-fadnavis-in-bhosari</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 19:16:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%286%29.jpg"                         length="164488"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात';  मिटकरींचा हल्लाबोल </title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत  नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13369/-supriyatai-eats-mutton-on-chaturthi-and-amol-foxes-on-ekadashi---mitkari-attack"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(4)1.jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :  </strong>शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंपर्क यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. मला मी त्यांच्या सोबत आहे यांचा प्रचंड अभिमान होता. मात्र हा व्यक्ती केवळ पैशाचा मागे लागलेला आहे, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांची भूमिका करून त्यांना महाराजांचे विचार समजत  नाहीत, उद्या पैशांसाठी ही व्यक्ती बहलोल खानाचीही भूमिका करेल अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. </p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे  उमेदवार शिवाजी आढळराव पाटील  यांच्या प्रचारार्थ  कडुस येथील कोपरा सभेत मिटकरी बोलत होते.  यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले,  मी कोल्हे साहेबांचा फॅन होतो, त्यांच्या सोबत राहायचो मला अभिमान वाटायचा  मी ज्यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज समजले मात्र तो माणूस केवळ केळव जटा  वाढवून साधुचा आव आणणारा निघाला.  मी राज्यभर दौरे केले होते यांच्यासोबत त्यांनी मात्र  मला दिल्लीत दोन दिवस  भेटीसाठी ताटकळत ठेवले होते असेही मिटकरी यांनी सांगितले.  छत्रपतींची भूमिका करणाऱ्या माणसाने गड किलयांचे जतन करायचे की तिथे जाऊन लव्ह सॉन्ग शूट करायचे हे भान सुद्धा याला नाही अशा शब्दांत कोल्हेंवर टीका केली.  </p>
<p> डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक भावनिक करण्याचा  प्रयत्न  केला जात आहे, त्याचा खरपूस समाचार मिटकरी यांनी घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थाळ तुमच्या गावाजवळ आहे, मात्र तूनही फक्त निवडून आले तेंव्हा गेलात, त्यानंतर डायरेक्ट प्रचारासाठी पाच वर्षांनी, त्यातही गडावर शिवाजीराव भेटले  तर कॅमेऱ्या समोर दादांचे दर्शन घेतले आणि त्या बातम्या चालवल्या, आमच्या समोर कोणतेही वडीलधारी व्यक्ती आली की आम्ही त्यांच्या पाया पडतो त्यात नवीन काय आहे,  एक मात्र मानले पाहिजे की शिवाजीरावांनी तुम्हाला पाया पडू दिले हा त्यांचा मोठेपणा आहे. <br /> <br />लोकसभा निवडणूक ही स्थानिक नाही तर ही देशाची निवडणूक आहे,  देशाच्या विकासाचा शक्तिशाली चेहरा म्हणून जग  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहात  आहे यामुळे आपल्याला विकासाला साथ देण्यासाठी शिवाजीराव आढळराव यांना संयदेत पाठवायचे आहे, असेही मिटकरी यांनी नमूद केले.  डायलॉग बाजी आम्हालाही करता येते, संसदेत शेवटच्या सत्रात कांद्याची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा अभिनय केला, मात्र तुम्हाला ज्या कामासाठी संसदेत पाठवले होते तिथे पाच वर्षे काय झोपा काढल्या  का? असा सवाल उपस्थित करत आढळराव यांनी त्यांच्या तीन टर्म मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत मिटकरी यांनी आढळराव यांना विकासासाठी मते द्या  असे आवाहन  केले.  तसेच अक्षय आढळराव यांनी संरक्षण क्षेत्रावरील आरोपावरून कोल्हे यांची केलेली पोळखोल उत्तम असल्याचे मिटकरी यांनी म्हंटले. </p>
<p>अजित पवार यांनी निष्ठा सोडली या कोल्हे यांच्या आरोपांवर उत्तर देताना मिटकरी म्हणाले, तुम्ही मनसे मध्ये होता, मग शिवसेना नंतर अजित पवारांच्या आशीर्वादानेच राष्ट्रवादीत आलात आणि खासदार झालात. आज त्यांचीही साथ सोडून 84 वर्षांच्या पवार साहेबांना प्रचारासाठी येण्याची गळ घालता , यामुळे तुम्ही  निष्ठा या शब्दावर न बोलणेच अधिक चांगले. अमित शहा यांना तुम्ही का भेटले होता? गरुड झेप सिनेमासाठी खरंच घर गहाण ठेवले की सोशल मिडियावर सहानुभूमी मिळवण्याचा प्रयत्न केला असा  सवाल ही मिटकरी यांनी उपस्थित केला. तसेच सुप्रिया ताई चतुर्थीला आणि अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात असा आरोप केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13369/-supriyatai-eats-mutton-on-chaturthi-and-amol-foxes-on-ekadashi---mitkari-attack</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13369/-supriyatai-eats-mutton-on-chaturthi-and-amol-foxes-on-ekadashi---mitkari-attack</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 18:23:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%284%291.jpg"                         length="282137"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका </title>
                                    <description><![CDATA[<p>चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(2)1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर : </strong>चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.</p>
<p>महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. </p>
<p>पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, शिरदाळे तसेच सातगाव पठार, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याच्या विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून पाणीप्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पवार यांनी दिले.</p>
<p>जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का? असा सवाल उपस्थित करत भाजपा सोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. </p>
<p>आढळराव पाटील म्हणाले, पंधरा वर्षे खासदार असताना व खासदार नसतानाही मी जनतेसाठी काम केले. जनतेच्या सुखदुःखात, लग्नाच्या, दशक्रियाच्या कार्यक्रमात सहभागी झालो, यात कमीपणा कसला? मी खासदार नसतानाही गावागावात निपी टाकण्यासाठी प्रयत्न केला आहे विविध विकासकामे मार्गी लावले आहेत. विद्यमान खासदारांना फोन केला की त्यांचे पीए उचलतात  व मीच खासदार बोलत आहे, असे सांगतात, खासदारांचा ८० सत्यांची टक्के निधी परत गेला, असे मी पेपरात वाचले. त्यामुळे जनतेने बिनकामाच्या खासदाराला घरी  बसवावे.</p>
<p>आपल्या खासदाराने त्यांच्या कोपरे या दत्तक गावाच्या तोंडाला पाने पुसली. पाणीटंचाईत तेथील महिलांना दोन ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, त्यांनी गाव वाऱ्यावर सोडले. पण माझ्या संस्था आणि कार्यकत्यांकडून दोन महिन्यांपासून तेथे टैंकर सुरु आहे. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणाऱ्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवायलाच लागेल. असे आढळराव पाटलांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 13:12:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%282%291.jpg"                         length="154571"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना’; अजित पवार</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(1).jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :</strong> लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाकळी हाजी येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आगपाखड केली आहे.</p>
<p>“खासदारकीचा राजीनामा द्यायला निघालेल्या डॉ. अमोल कोल्हेंना मीच थांबविले आणि पाच वर्षे काम करा म्हटले. आणि आता हाच बाबा खासदारकीची मते मागत फिरतोय. याला नाटकाच्या कामातून वेळ मिळेना आणि आता नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय” अशी टीका अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर केली आहे.</p>
<p>माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, भाजपच्या नेत्या जयश्री पलांडे, माजी सभापती सुनीता गावडे आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13333/-he-didn-t-get-time-from-drama-work---ajit-pawar</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 12:53:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%281%29.jpg"                         length="139671"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र</title>
                                    <description><![CDATA[<p>महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(2)1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर :  </strong>महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.</p>
<p>जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यापूर्वीच आढळरावांना पाठिंबा दिला असून संघटना आढळराव यांच्या प्रचारकार्यात सक्रिय आहे. तर नुकताच कष्टकरी जनता आघाडीनेही आढळराव यांना पाठिंबा दिला आहे.</p>
<p>कुणबी मराठा महासंघाने महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, विकासाचे व्हीजन घेऊन २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सरकार काम करत आहे. आमच्या संघटनेच्या समन्वयक व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा संगीता गुंजाळ यांनी या भागातील सर्व महायुतीच्या उमेदवारांशी मराठा आरक्षण व सगेसोयरे अंमलबजावणीबाबत चर्चा केली आहे. सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर संसदेत आवाज आपण आवाज उठवाल, ही खात्री झाली आहे. तसेच आपले सरकारच आम्हाला योग्य न्याय देईल, अशा विश्वास आम्हाला आहे.</p>
<p>दरम्यान, रिक्षा चालक, फेरीवाले, धुणेभांडी करणार्या महिला, बांधकाम मजूर यांचे संघटन असलेल्या कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे उर्फ माऊली यांनी देखील आढळराव यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ केले. त्यामुळे आमचा २५ वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.</p>
<p>तसेच, जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आढळरावांच्या प्रचारात सक्रीय असून यापूर्वी शिरुर, न्हावरा येथे मोठ्या सभांतून त्यांनी आढळरावांना संघटनेच्या एकजूटीचे बळ दाखवून दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आढळरावांच्या महाविजयासाठी कष्ट घेत असल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 11:33:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%282%291.jpg"                         length="106320"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13217/interaction-with-citizens-in-sunbai-maidan--hadapsar-constituency-for-adahrao-patal-in-shirur"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/madhuri-akshay-adha-rao.webp" alt=""></a><br /><p><strong>हडपसर : </strong>शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला.</p>
<p>यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अभिजीत बाबर, राष्ट्रवादीच्या नम्रता गोंदळ, रिपाइंच्या सरिता कुंभार, सरिता सोनवणे, छाया बोरूडे, राणी वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी माधुरी अक्षय आढळराव यांनी ससाणे नगर येथील रिपबलिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली. तसेच ससाणे नगर येथील स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या वतीने त्यांचा स्वामींची मूर्ती देवून स्वागत करण्यात आले.</p>
<p>यावेळी माधुरी अढळराव म्हणाल्या, आम्ही घरोघरी जावून शिवाजीराव अढळराव पाटील यांचा प्रचार करीत आहोत. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हडपसर भागात महिलांचे प्रश्न, लाईट, पाणी, रास्ते, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे.  या अनेक प्रश्नांवर पुढील काळात काम करण्याची गरज आहे. </p>
<p>अभिजीत बाबर म्हणाले, विकासासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचां खासदार निवडून देणे गरजेचे आहे. मागच्या वेळी चूक झाली. संभाजी महारांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला जनतेने निवडून दिलं. या खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही कार्यकर्त्यांने कोणाचाही फोन उचलला नाही. जो काही निधी आणला तो शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आणला. शिरूर लोकसभा मतदार संघात तब्बल 700 गांव आहेत. अन् अस एकही गांव नाही जिथे आढळराव यांचा निधी पोहोचलेला नाही. त्यामुळे यंदा शिवाजीराव अढळराव पाटील हेच विजयी होणार, असा आशावाद बाबर यांनी व्यक्त केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13217/interaction-with-citizens-in-sunbai-maidan--hadapsar-constituency-for-adahrao-patal-in-shirur</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13217/interaction-with-citizens-in-sunbai-maidan--hadapsar-constituency-for-adahrao-patal-in-shirur</guid>
                <pubDate>Wed, 08 May 2024 14:07:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/madhuri-akshay-adha-rao.webp"                         length="40962"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Shirur Lok Sabha Election: बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला; म्हणून महायुतीला देऊया साथ..! </title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(9).jpg" alt=""></a><br /><p><strong>शेती-माती-संस्कृतीसाठी बैलगाडा प्रेमी, शेतकऱ्यांची एकजूट करुया</strong></p>
<p><strong>पिंपरी । </strong>महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. </p>
<p>शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून ३७ हजाराहून अधिक मतांची आघाडी आढळराव पाटील यांना मिळाली होती. यावेळी महायुतीच्या माध्यमातून १ लाख मतांचे ‘लीड’ देण्याचा निर्धार आमदार लांडगे यांनी केला आहे. </p>
<p>आमदार लांडगे म्हणाले की, केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात दि. ११ जुलै २०११ रोजी बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम २२ (२) नुसार बैल या प्राण्याचा समावेश संरक्षित प्राण्याच्या यादीत करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने देशभरात शर्यतींवर बंदी केली. त्यानंतर २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपा महायुती सरकार आले. तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.  ११ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना आणि महायुती सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा लक्षा यशस्वी झाला. </p>
<blockquote class="format1">
<blockquote class="format2">
<p>शिरुर लोकसभा मतदार संघातील बैलगाडा मालक, शेतकरी, बैलगाड प्रेमी, बळीराजाला आम्ही आवाहन करतो की, बैलांची धावण्याची क्षमता अहवाल (रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स) आणि सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती व खर्चाची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने घेतली. विधीमंडळ सभागृहात कायदा केला. तो कायदा महायुती सरकारने मंजूर केला. त्या महायुती सरकारच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना साथ द्यावी आणि महायुतीला निवडून द्यावे.</p>
<p><strong>– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा.</strong></p>
</blockquote>
</blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13139/shirur-lok-sabha-election--ban-on-bullock-cart-race-lifted-legislated--so-let-s-support-mahayuti</guid>
                <pubDate>Tue, 07 May 2024 18:07:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%289%29.jpg"                         length="237014"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा </title>
                                    <description><![CDATA[<p>महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(5).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.</p>
<p>यावेळी पुर्वी वळसे पाटील म्हणाल्या की, आपण विचारपण करू शकत नाही की, सुरूवातीचे तीस वर्ष आपली मुलं परदेशी शकतील, तिकडे राहतील अन् व्यवसाय करून स्वत: च्या पायावर उभी राहतील. मला नाही वाटत की माझ्याही वडिलांनी किंवा माझ्याही आजोबांनी असा कधी विचार केला नव्हता की त्यांच्या घरातलं कोणी कधी परदेशी जाऊ शकेल, परंतु आता सगळं काही शक्य झालं आहे. </p>
<p>गेल्या तीस वर्षात आपल्या मागास भागात जो विकास झाला आहे. जी विकासाची गती आली आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे दुरदृष्टी ठेवणारे नेते आपल्याकडे आहेत. त्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अशातच वळसे पाटील आणि आढळराव साहेबांचा तुम्ही सैनिक आहात. त्यामुळे वळसे पाटील साहेबांचा आपल्या सगळ्यांसाठी हा निरोप आहे. की येत्या १३ मे ला घड्याळ्याच्या समोर बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटलांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचा आहे. असे आवाहन देखील पुर्वा वळसे पाटीलांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. </p>
<p>दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao</guid>
                <pubDate>Tue, 07 May 2024 17:32:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%285%29.jpg"                         length="160179"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        