<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/209/shivajirao-adharao-patil" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>Shivajirao Adharao Patil - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/209/rss</link>
                <description>Shivajirao Adharao Patil RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान </title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/your-paragraph-text-(7).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळमधून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे. अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.</p>
<p>“राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.</p>
<p>दरम्यान, अमोल कोल्हे यांची घोषणा म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका होत आहे. मोठ्या अपेक्षाने कोल्हे यांना वेळी लोकांनी निवडून दिले होते, मात्र त्यांनी पाच वर्षात मतदारसंघाकडे पाठ फिरवली. लोकांची तसेच मतदारसंघात विकास कामे केली नाही. आता केवळ पराभव दिसू लागल्याने ते अभिनय सोडण्याची भाषा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13475/%22if-time-permits--i-will-take-a-break-from-acting-%22-that-s-why-kolhe-made-the-statement</guid>
                <pubDate>Fri, 10 May 2024 16:37:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/your-paragraph-text-%287%29.jpg"                         length="104310"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>“बिनकामाच्या खासदाराला आता घरी बसवा”, आढळरावांची सडकून टिका </title>
                                    <description><![CDATA[<p>चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(2)1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर : </strong>चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.</p>
<p>महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. </p>
<p>पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, शिरदाळे तसेच सातगाव पठार, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याच्या विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून पाणीप्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पवार यांनी दिले.</p>
<p>जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का? असा सवाल उपस्थित करत भाजपा सोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. </p>
<p>आढळराव पाटील म्हणाले, पंधरा वर्षे खासदार असताना व खासदार नसतानाही मी जनतेसाठी काम केले. जनतेच्या सुखदुःखात, लग्नाच्या, दशक्रियाच्या कार्यक्रमात सहभागी झालो, यात कमीपणा कसला? मी खासदार नसतानाही गावागावात निपी टाकण्यासाठी प्रयत्न केला आहे विविध विकासकामे मार्गी लावले आहेत. विद्यमान खासदारांना फोन केला की त्यांचे पीए उचलतात  व मीच खासदार बोलत आहे, असे सांगतात, खासदारांचा ८० सत्यांची टक्के निधी परत गेला, असे मी पेपरात वाचले. त्यामुळे जनतेने बिनकामाच्या खासदाराला घरी  बसवावे.</p>
<p>आपल्या खासदाराने त्यांच्या कोपरे या दत्तक गावाच्या तोंडाला पाने पुसली. पाणीटंचाईत तेथील महिलांना दोन ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, त्यांनी गाव वाऱ्यावर सोडले. पण माझ्या संस्था आणि कार्यकत्यांकडून दोन महिन्यांपासून तेथे टैंकर सुरु आहे. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणाऱ्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवायलाच लागेल. असे आढळराव पाटलांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13334/%22sit-the-unemployed-mp-at-home-now%22--said-adar-rao</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 13:12:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%282%291.jpg"                         length="154571"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र</title>
                                    <description><![CDATA[<p>महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(2)1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर :  </strong>महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.</p>
<p>जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यापूर्वीच आढळरावांना पाठिंबा दिला असून संघटना आढळराव यांच्या प्रचारकार्यात सक्रिय आहे. तर नुकताच कष्टकरी जनता आघाडीनेही आढळराव यांना पाठिंबा दिला आहे.</p>
<p>कुणबी मराठा महासंघाने महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, विकासाचे व्हीजन घेऊन २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सरकार काम करत आहे. आमच्या संघटनेच्या समन्वयक व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा संगीता गुंजाळ यांनी या भागातील सर्व महायुतीच्या उमेदवारांशी मराठा आरक्षण व सगेसोयरे अंमलबजावणीबाबत चर्चा केली आहे. सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर संसदेत आवाज आपण आवाज उठवाल, ही खात्री झाली आहे. तसेच आपले सरकारच आम्हाला योग्य न्याय देईल, अशा विश्वास आम्हाला आहे.</p>
<p>दरम्यान, रिक्षा चालक, फेरीवाले, धुणेभांडी करणार्या महिला, बांधकाम मजूर यांचे संघटन असलेल्या कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे उर्फ माऊली यांनी देखील आढळराव यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ केले. त्यामुळे आमचा २५ वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.</p>
<p>तसेच, जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आढळरावांच्या प्रचारात सक्रीय असून यापूर्वी शिरुर, न्हावरा येथे मोठ्या सभांतून त्यांनी आढळरावांना संघटनेच्या एकजूटीचे बळ दाखवून दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आढळरावांच्या महाविजयासाठी कष्ट घेत असल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13301/a-letter-of-support-from-the-all-india-kunbi-maratha-federation-to-adha-rao</guid>
                <pubDate>Thu, 09 May 2024 11:33:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%282%291.jpg"                         length="106320"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>तुम्ही साहेबांचे सैनिक, वळसे साहेबांचा तुमच्यासाठी निरोप आलाय, आढळरावांना विजयी करा </title>
                                    <description><![CDATA[<p>महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/pcmc-aarogya-sevika-(5).jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.</p>
<p>यावेळी पुर्वी वळसे पाटील म्हणाल्या की, आपण विचारपण करू शकत नाही की, सुरूवातीचे तीस वर्ष आपली मुलं परदेशी शकतील, तिकडे राहतील अन् व्यवसाय करून स्वत: च्या पायावर उभी राहतील. मला नाही वाटत की माझ्याही वडिलांनी किंवा माझ्याही आजोबांनी असा कधी विचार केला नव्हता की त्यांच्या घरातलं कोणी कधी परदेशी जाऊ शकेल, परंतु आता सगळं काही शक्य झालं आहे. </p>
<p>गेल्या तीस वर्षात आपल्या मागास भागात जो विकास झाला आहे. जी विकासाची गती आली आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे दुरदृष्टी ठेवणारे नेते आपल्याकडे आहेत. त्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अशातच वळसे पाटील आणि आढळराव साहेबांचा तुम्ही सैनिक आहात. त्यामुळे वळसे पाटील साहेबांचा आपल्या सगळ्यांसाठी हा निरोप आहे. की येत्या १३ मे ला घड्याळ्याच्या समोर बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटलांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचा आहे. असे आवाहन देखील पुर्वा वळसे पाटीलांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. </p>
<p>दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/13138/you-are-saheb-s-soldiers--valse-saheb-has-sent-a-message-for-you--win-over-the-vatharao</guid>
                <pubDate>Tue, 07 May 2024 17:32:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/pcmc-aarogya-sevika-%285%29.jpg"                         length="160179"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विद्यमान खासदार ‘पार्टटाइम राजकारणी..’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला</title>
                                    <description><![CDATA[<p>गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे. अशातच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका केली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/images1.jpg" alt=""></a><br /><p>बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले</p>
<p><strong>बारामती :</strong> बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. </p>
<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. येथे महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात आहेत. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार येथून मैदानात उतरवायला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते इकडेच दिसून आले. मात्र आता अजित पवारांनी शिरूरमध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. </p>
<p><strong>मी विकासावर बोलतो रडीचा डाव खेळत नाही</strong></p>
<p>सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. "मी सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना सांगत होतो की शेवटच्या सभेमध्ये रडीचा डाव खेळला जाईल. आज आमचा पट्टा रडला मात्र मी विकास कामांवर मत मागतो भावनिक राजकारण करत नाही", अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12870/current-mp--part-time-politician-----kolhenna-khochak-tola-of-athdarao-patal</guid>
                <pubDate>Sun, 05 May 2024 13:27:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/images1.jpg"                         length="6974"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'...अन्यथा कोल्हेंनी जाहीर माफी मागून निवडणूकीतून बाहेर पडावे'; आढळरावांनी कोल्हेंना खडसावले</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/shivajirao-adharao-patil-amol-kolhe.jpg" alt=""></a><br /><p><strong>मंचर :</strong> शिरूर लोकसभा मतदारसंघात सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी उठवली. त्यामुळे तीन महिन्यांपासून कांदा कांदा ओरड करणाऱ्या डॉ.  अमोल कोल्हेंचा हा मुद्दाच सरकारने हिरावून घेतल्याने कोल्हेंना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे ते सैरभैर होऊन, देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी पोरकट भाष्य करू लागले आहेत, असा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला आहे.</p>
<p>ओतूर येथील सभेत, कंपनीच्या व्यावसायिक फायद्यासाठी आढळरावांनी संसदेत संरक्षण खात्याविषयी ७५ प्रश्न विचारल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चौफेर झोडपले. ते म्हणाले की, मी माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न त्यांनी दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागून कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना ठणकावले. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नसून हार्डवेअरची आहे. मुळात पाच वर्षे गायब राहून निवडणूक आल्यावर कांदा प्रश्नावर कोल्हेंनी फक्त ओरड केली, पण त्यासाठी काय केलं, सरकारकडे पाठपुरावा केला का? याचे उत्तर त्यांनी द्यावे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12782/----otherwise-the-foxes-should-make-a-public-apology-and-get-out-of-the-election---adha-rao-reprimanded-the-kolhe</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 17:37:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/shivajirao-adharao-patil-amol-kolhe.jpg"                         length="90986"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'अमोल कोल्हे मतदारांना गृहीत धरून वागत आहेत'; आढळरावांचा टोला</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/untitled-design-(2).jpg" alt=""></a><br /><p><strong>चाकण : </strong>शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.</p>
<p>शिरूर लोकसभेसाठी मनसेच्या वतीने चाकणच्या आंबेठाण चौकात मेळावा झाला. या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, मनसे नेते राजेंद्र बाबू वागस्कर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, सरचिटणीस अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर, सभापती कैलास लिभोरे, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, सचिन चिखले, संदीप पवार, मनोज पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.</p>
<p>दरम्यान, मनसैनिक शिरूर लोकसभेत तन-मन-धनाने जिवाचं रान करून आढळरावांसाठी मतदान करून घेण्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत आहेत. पिंपरीसाठी माजी नगरसेवक सचिन चिखले, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, हवेलीची धुरा किरण माने, चेतन चौधरी, शिरूरची धुरा रवी मुरादे, नाना लांडे, किरण गव्हाणे, आंबेगावची धुरा बाबू बाणखेले, आशिष शिंदे, किरण गव्हाणे, खेडची धुरा मंगेश सावंत, सनी लोणकर, नवनाथ लोखंडे सांभाळत आहेत. विद्यार्थी सेनेचा ३०० मनसैनिकांचा मेळावा खेड तालुक्यात झाला आहे. शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी या सर्वच भागातले मनसैनिक आढळरावांच्या प्रचारासाठी तळागाळातल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, अशी माहिती विद्यानंद मानकर यांनी दिली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12781/-amol-foxes-taking-voters-for-granted---a-group-of-finders</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 17:17:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/untitled-design-%282%29.jpg"                         length="150036"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जोर कायम, शिवाजी आढळरावांना मताधिक्य देण्याचा संकल्प</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-03-at-7.48.51-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी : </strong>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे.</p>
<p>शिरूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व घटक पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. महायुतीच्या वतीने आढळराव पाटील यांचा प्रचाराचा जोर भोसरी मतदारसंघात कायम आहे.  आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना 1 लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प केला असून, ठिकठिकाणी जनसंवाद बैठका घेण्यात येत आहेत. याद्वारे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे केंद्र सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने घेतलेली महत्त्वकांक्षी निर्णय, कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याबाबत तळागाळातील नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे.</p>
<p>जनसंवाद मोहिमेबद्दल बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले,  ‘जनसंवाद..च्या माध्यमातून भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. या निवडणुकीत मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवतील आणि भारत एक बलशाली राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान करतील, असा विश्वास आहे. जनसंवाद बैठकांना नागरिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळत असून आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 13:23:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-03-at-7.48.51-pm.jpeg"                         length="86898"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंना ‘ओपन चॅलेंज’; अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं!</title>
                                    <description><![CDATA[<p>शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/images.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिले आहे.</p>
<p>“गेली ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप अमोल कोल्हे करू लागले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं”, असं खुलं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर कांदाभावावरुन धारेवर धरलं होतं. त्यावर उत्तर देताना आढळरावांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.</p>
<h6><strong>अमोल कोल्हे काय म्हणाले होते?</strong></h6>
<p>दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. ‘काहींनी १५ वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे’, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळराव पाटलांवर केला होता.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12563/amol-kolhenna--open-challenge--by-adharao-patal--otherwise--the-foxes-should-get-out-of-the-election-arena</guid>
                <pubDate>Thu, 02 May 2024 19:23:44 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/images.jpg"                         length="6077"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमुळे ‘‘वारे फिरले’’; शिरुरमध्ये आढळराव पाटलांचा झंझावात!</title>
                                    <description><![CDATA[<p>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची एतिहासिक सभा झाली. यामुळे पुणे, शिरूर आणि मावळ यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. मोदी सरकारचे व्हीजन आणि देशहिताचे निर्णय यामुळे महायुतीचे पारडे जड झाले असून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12450/prime-minister-narendra-modi-s-meeting--turned-the-winds---in-shirur--there-is-a-fight-between-patals"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-01-at-4.34.05-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रमध्ये जाहीर सभांचा झंझावत सुरू केला. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची एतिहासिक सभा झाली. यामुळे पुणे, शिरूर आणि मावळ यासह बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. मोदी सरकारचे व्हीजन आणि देशहिताचे निर्णय यामुळे महायुतीचे पारडे जड झाले असून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे.</p>
<p>राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावर शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुक लढवत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता खेडस, आंबेगाव, जुन्नर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विचारांचे आमदार आहेत. त्यामुळे सहापैकी ४ मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद वैयक्तिकरित्या मोठी आहे. तसेच भोसरीमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाख मतांचे दीड देण्याचा निर्धार झाला. एकमेव शिरूर विधानसभा मतदार शरद पवारांच्या विचारांचे अशोक पवार आमदार आहेत. मात्र, या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.</p>
<p>दरम्यान,महायुतीच्या प्रत्यक पदाधिकाऱ्यांवर टीम नोचा वॉच आहे. प्रत्येक पदाधिकारी त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतो किंवा नाही ? याचा लेखाजोखा प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्याद्वारे अपेक्षित काम न केलेल्या उमेदवारांचा इच्छूकांचा रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आता अंग झाडून कामाला लागले आहे.</p>
<p><strong>महायुतीची वज्रमूठ…</strong></p>
<p>मोदी यांनी आपल्या भाषणात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केले. “गेल्या ४५ वर्षापासून महाराष्ट्र अतृप्त आत्म्यांची शिकार ठरला आहे,” असा घणाघात केला. महाविकास आघाडीची मदार राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे महायुतीकडून या दोन्ही नेत्यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. दरम्यान, उरळी कांचन येथे शिरुरचे महाविकास आघाडीचे उमदेवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. शरद पवार यांच्या सभेला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. दुसरीकडे, मोदींच्या सभेमुळे महायुतीला मात्र चैतन्य प्राप्त झाले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.</p>
<p><strong>अजित पवार तळ ठोकणार…!</strong></p>
<p>बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान ७ मे रोजी पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ ते ४ दिवस अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये तळ ठोकणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील प्रचारामध्ये ‘बोटचेपी’ भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. अद्याप काही ठिकाणी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ‘अॅक्टिव्ह’ झालेले नाहीत. त्याबाबत अजित पवार स्वतः जातीने लक्ष घालतील असे सांगण्यात येते. त्यामुळे आढळराव पाटील यांची ‘बारी’ बसणार, असे वातावरण निर्माण झाले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12450/prime-minister-narendra-modi-s-meeting--turned-the-winds---in-shirur--there-is-a-fight-between-patals</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12450/prime-minister-narendra-modi-s-meeting--turned-the-winds---in-shirur--there-is-a-fight-between-patals</guid>
                <pubDate>Wed, 01 May 2024 18:09:55 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-01-at-4.34.05-pm.jpeg"                         length="164596"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच नावाची चर्चा</title>
                                    <description><![CDATA[<p>राज्यात चौथ्या टप्यात होत असलेल्या लक्षवेधी लढतीमध्ये शिरूर लोकसभा मंतदारसंघांचा क्रमांक वरचा लागतो. या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  अशी लढत असली तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध  अजित पवार  अशीच आहे कारण इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगलेला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11944/the-name-of-shivajirao-adharao-patil-is-being-discussed-as-a-competent-candidate"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/untitled-design-(7).jpg" alt=""></a><br /><p><strong>शिरूर :</strong> राज्यात चौथ्या टप्यात होत असलेल्या लक्षवेधी लढतीमध्ये शिरूर लोकसभा मंतदारसंघांचा क्रमांक वरचा लागतो. या मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  अशी लढत असली तरी खरी लढत शरद पवार विरुद्ध  अजित पवार  अशीच आहे कारण इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगलेला आहे.</p>
<p>दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेत्यांच्या प्रचार तोफा देखील धडाडत आहेत. सभांमधून उमेदवारांच्या तुलना होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील येताना दिसत आहे. या मतदारसंघात संपर्कात कोण कमी अथवा जास्त आहे, यावर अधिक भर दिला असल्याचे दिसत आहे.</p>
<p>विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षात मतदारांसोबत संपर्क देण्यात कमी पडल्याचे वास्तव आहे. ही खंत राष्ट्रवादीच्या फुटी पूर्वी त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत होते. त्यामुळे कोल्हे यांचे राजकीय वजन देखील खालावल्याची चर्चा होती. सध्याच्या प्रचारात देखील मतदारांमधून हाच प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला उत्तर देताना लोकसभेत प्रश्न मांडणारा मी खासदार असल्याचे कोल्हे सांगत असले तरी हा राजकीय प्रोपोगंडा मतदार संघात फिट होताना दिसत नाही.</p>
<p>याउलट पराभूत झाल्यापासून शिवाजीराव आढळराव पाटील हे सतत लोकांमध्ये मिसळत राहिले. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी चालूच ठेवल्या. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांकडे भेटी घेऊन रखडलेले प्रश्न मांडत होते. भविष्यातील राजकीय चित्र काय असेल याबाबत साशंकता असताना देखील त्यांनी आपले काम चालूच ठेवल्याचे दिसत होते. त्यामुळे कोल्हे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांचेच नाव राजकीय जाणकारांच्या मधून देखील चर्चेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यानंतर त्यांनी देखील आढळराव पाटील यांच्याच नावाला पसंती दिली. त्यावरून आढळराव पाटील यांची जनतेसोबतची कने्टिव्हिटी स्पष्ट होते. पराभूत होऊनही लोकांच्या सोबत संपर्क ठेवण्याचा फायदा आढळराव यांना सध्याचा राजकीय प्रोपोगंडा राबवताना फायद्याचा ठरत असल्याचे बोलले जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11944/the-name-of-shivajirao-adharao-patil-is-being-discussed-as-a-competent-candidate</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11944/the-name-of-shivajirao-adharao-patil-is-being-discussed-as-a-competent-candidate</guid>
                <pubDate>Sat, 27 Apr 2024 16:42:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/untitled-design-%287%29.jpg"                         length="106331"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील'; अजित पवार</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11669/-adharao-patil-will-win-from-shirur-lok-sabha-constituency---ajit-pawar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-25-at-4.46.32-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.</p>
<p>‘शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हेच विजयी होतील, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मात्र, आढळराव पाटलांना किती मताधिक्य मिळेल? या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही’, असेही त्यांनी परखडपणे सांगितले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे.अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p>अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11669/-adharao-patil-will-win-from-shirur-lok-sabha-constituency---ajit-pawar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11669/-adharao-patil-will-win-from-shirur-lok-sabha-constituency---ajit-pawar</guid>
                <pubDate>Thu, 25 Apr 2024 21:19:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-25-at-4.46.32-pm.jpeg"                         length="93582"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        