<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/205/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>शिवाजीराव आढळराव पाटील - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/205/rss</link>
                <description>शिवाजीराव आढळराव पाटील RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>अभिनेता अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात : शिवाजीराव आढळराव पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p>सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-17-at-10.03.32-am.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी : </strong>सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान आता दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.</p>
<p>काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघात आपला प्रचार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आढळरावांनी कोल्हेंवर कडाडून टिका केली. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मीपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजिते पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत. असा पलटवार आढळरावांनी कोल्हेंवर केलाय. अमोल कोल्हे सध्या महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्यावर आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय. </p>
<p>दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की,  मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला.  अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune</guid>
                <pubDate>Mon, 22 Apr 2024 00:04:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-17-at-10.03.32-am.jpeg"                         length="53860"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद! </title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/123.jpg" alt=""></a><br /><p><strong>वाघोली : </strong>लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शुक्रवारी हडपसर विधानसभा मतदार संघाचा दौरा केल्यानंतर आज वाघोली – शिरूर  विधानसभा मतदार संघातील वाघोली परिसरात दौरा केला.</p>
<p>वाघोलीतील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आजच्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ड्रीम संकल्प सोसायटी येथे जावून स्थानिकांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून महायुतीच्या विजयासाठी आशिर्वाद घेतले.</p>
<p>लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त केसनंद फाटा येथे जावून वाघोलीचे उपसरपंच मारुती भगवंत गाडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी बीजेएस महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत शिवाजीराव अढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यअहवाल वाटपादरम्यान, ”घड्याळ तेच, वेळ नवी” अशी घोषणा करत उपस्थित समस्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांना प्रचंड बहूमातांनी, महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला.</p>
<p>त्यानंतर ऑक्सीव्हॅली-२, नियती वेलान सोसायटी येथील रहिवाश्यांची भेट घेतली. स्थानिकांशी संवाद साधत असता, येथील  पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या व इतर समस्यांवर चर्चा करत, त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन देखील अढळराव पाटलांनी त्यांना दिले.</p>
<p>यावेळी पुणे जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद, स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन  शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response</guid>
                <pubDate>Sun, 21 Apr 2024 23:52:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/123.jpg"                         length="107329"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आढळरावांच्या कोपरासभांना शिरूरमध्ये मोठा प्रतिसाद, विकासाची जबाबदारी माझी, आढळरावांचं मतदारांना आश्वासन</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराला प्रंचड वेग येत आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरूवात केलीय.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10387/big-response-in-shirur-s-koprasabha-of-adharao--i-am-responsible-for-development--adharao-s-promise-to-the-voters"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/437569024_960899795406958_4226148277995255298_n.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा प्रचाराला प्रंचड वेग येत आहे. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोपरा सभा घेण्यास सुरूवात केलीय. आढळरावांच्या कोपरा सभांना आता नागरिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहेत. त्यातच अण्णापुर येथे गावकऱ्यांनी आढळरावांचं जंगी स्वागत केलं. </p>
<p>अण्णापुर येथे झालेल्या कोपरा सभेत आढळरावांनी लोकांना विश्वासात घेत लोकांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केलं.  यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. मला तुम्ही पाठिंबा  देणारच आहात. तुमच्या भागाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडून निश्चित राहा, असे आवाहन आढळरावांकडून करण्यात आले.</p>
<p>शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रामलिंग येथे भेट देऊन ग्रामदैवत रामलिंग महादेवाचे आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले. शोभाताई रसिकलाल धारीवाल सभामंडपात मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना गावाचे प्रलंबित प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असे आश्वासन दिले. </p>
<p>दरम्यान, कर्डेलवाडील येथेदेखील आढळराव यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. यावेळी प्रवीण कर्डिले म्हणाले की , सत्तेत नसतानाही आढळराव दादांनी आपल्या विकासकामांना हातभार लावला. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहु. या वेळी बोलतांना आढळराव यांनी पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढून हा प्रश्न मिटवला जाईल असेही त्यांनी सांगितले. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10387/big-response-in-shirur-s-koprasabha-of-adharao--i-am-responsible-for-development--adharao-s-promise-to-the-voters</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10387/big-response-in-shirur-s-koprasabha-of-adharao--i-am-responsible-for-development--adharao-s-promise-to-the-voters</guid>
                <pubDate>Tue, 16 Apr 2024 15:07:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/437569024_960899795406958_4226148277995255298_n.jpg"                         length="193181"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिरुर लोकसभा मतदार संघात लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे : </strong>उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/9599/in-the-shirur-lok-sabha-constituency--lande-s-visit-to-the-party-is-heavy"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-09-at-23.30.19.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा धर्म पाळल्यास भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे. </p>
<p>महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली. </p>
<p>भोसरी विधानसभेत तब्बल  पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.   </p>
<p><strong>...म्हणून लांडे सोबतीला असणे गरजेचे !</strong></p>
<p>गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना ९० हजार मते पडली आहेत. त्यांचा पराभव झाला खरा. मात्र त्यावेळी त्यांच्या राजकीय खेळ्या चांगल्या<img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-09-at-23.30.19.jpeg" alt="WhatsApp Image 2024-04-09 at 23.30.19"></img>च चर्चेत राहिल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी अजित दादांची मनधरणी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरायच्या पाच मिनिटे आधीच माघार घ्यायला लावली. थेट चिन्हावर आणि पक्षावर न लढताही त्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्या बाजूने ठेवण्याची किमया केली होती. त्यांच्या या राजकीय खेळ्या अनेकांच्या अडचणीच्या ठरू शकतात याची जाणीव आढळराव पाटील यांना होती. त्यामुळे आधीच भेट घेऊन त्यांची मनधरणी करत लांडे यांची ताकद आपल्या बाजूने ठेवण्याची गरज आढळरावांना देखील निर्माण झाल्याची चर्चा आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/9599/in-the-shirur-lok-sabha-constituency--lande-s-visit-to-the-party-is-heavy</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/9599/in-the-shirur-lok-sabha-constituency--lande-s-visit-to-the-party-is-heavy</guid>
                <pubDate>Wed, 10 Apr 2024 10:55:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-09-at-23.30.19.jpeg"                         length="73205"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        