<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/190/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>लोकसभा निवडणूक - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/190/rss</link>
                <description>लोकसभा निवडणूक RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>Lok Sabha Speaker Election 2024 : भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली</title>
                                    <description><![CDATA[<p>18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला. लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/32442/lok-sabha-speaker-election-2024--bjp-s-om-birla-announces-election-for-the-post-of-lok-sabha-speaker"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/om-birla-k.suresh.jpg" alt=""></a><br /><p>18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के. सुरेश यांचं आव्हान होतं. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला. लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात होते. आज स्पीकरची निवड होईल. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण  आहे. कारण भाजपाकडून सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची स्पीकरपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.</p>
<p>INDIA आघाडीचे उमेदवार के. सुरेश केरळच्या मवेलीकाराचे प्रतिनिधीत्व करतात. ते 8 वेळा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. या निवडणुकीत त्यांचा मार्ग सोपा नव्हता. 543 सदस्यांच्या लोकसभेत सध्या 542 खासदार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही सीट खाली आहे. लोकसभेत 293 खासदार असलेल्या NDA कडे स्पष्ट बहुमत आहे. INDIA आघाडीकडे 236 खासदारांच संख्याबळ आहे. अपक्षासह अन्य एकूण 13 खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 271 मतांची आवश्यकता आहे.</p>
<p><strong>1976 नंतर पहिल्यांदा होणार वोटिंग</strong></p>
<p>काँग्रेसप्रणीत INDIA आघाडी विरोधी पक्षात असून त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळ नाहीय. तृणमुल काँग्रेसने इंडिया आघाडीने आमच्याशी चर्चा केली नाही, असं म्हटलय. TMC ने साथ दिली नाही, तर इंडिया आघाडीच संख्याबळ फक्त 204 राहील. लोकसभा अध्यक्षाची निवड सर्वसहमतीने होते. लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. 1976 नंतर पहिल्यांदा लोकसभा स्पीकरच्या पदासाठी निवडणूक होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/32442/lok-sabha-speaker-election-2024--bjp-s-om-birla-announces-election-for-the-post-of-lok-sabha-speaker</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/32442/lok-sabha-speaker-election-2024--bjp-s-om-birla-announces-election-for-the-post-of-lok-sabha-speaker</guid>
                <pubDate>Wed, 26 Jun 2024 12:02:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/om-birla-k.suresh.jpg"                         length="115604"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढविन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>धाराशिव –</strong> मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका लोकसभा निवडणूकांत भाजपाला मराठवाड्यात सर्वाधिक बसला. या ठिकाणी भाजपाचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पडले. जालनातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला. तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही. मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत <a href="https://www.tv9marathi.com/national/asaduddin-owaisi-has-demanded-that-the-government-should-remove-the-50-percent-reservation-limit-1221807.html"><strong>निवडणूक</strong> </a>देखील लढवेल असे स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.</p>
<p>लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपाचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरु आहे. याच अनुषंगाने</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/32178/explanation-by-paksane-sandhi-dilyas-me-grampanchayat-ladwin--former-union-minister-raosaheb-danve"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/raosaheb-danve-1.jpg" alt=""></a><br /><p><strong>धाराशिव –</strong> मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फटका लोकसभा निवडणूकांत भाजपाला मराठवाड्यात सर्वाधिक बसला. या ठिकाणी भाजपाचे तगडे उमेदवार असलेले माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पडले. जालनातून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले आणि याच ठिकाणी भाजपाला सर्वात मोठा हादरा बसला. तसेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावर आता रावसाहेब दानवे यांनी आपण राज्यसभा मागणार नाही, विधानपरिषद मागणार नाही, विधानसभा लढविणार नाही. मात्र पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत <a href="https://www.tv9marathi.com/national/asaduddin-owaisi-has-demanded-that-the-government-should-remove-the-50-percent-reservation-limit-1221807.html"><strong>निवडणूक</strong> </a>देखील लढवेल असे स्पष्ट मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.</p>
<p>लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर भाजपाचे महाराष्ट्रभर चिंतन बैठकीचे आयोजन सुरु आहे. याच अनुषंगाने माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे संपूर्ण मराठवाड्यात फिरून कार्यकर्त्यांसोबत चिंतन बैठक घेत आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की मला पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढून काम करेन असे ते स्पष्ट म्हणाले.</p>
<h3>अब्दुल सत्तार कोणत्या दिशेला उभे राहतात त्यावर..</h3>
<p>अब्दुल सत्तार नेमकं कोणत्या दिशेने तोंड करून उभे राहतात त्यावर त्यांना विधानसभेला निवडून आणायचे की पाडायचे ? हे ठरवणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मी नेहमीप्रमाणे पूर्वेला देवदर्शनासाठी उभा राहतो आणि देवदर्शन घेतो. ते नेहमी पश्चिमेला तोंड करून उभे राहतात ते जर पूर्वेला आमच्या बाजूला तोंड करून उभे राहिले. तर मला आदेश आला तर मी त्यांचा प्रचार करेन. ते जर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले तर विरोधात प्रचार करेल. मात्र ते कोणती भूमिका घेतात यावर मी ठरवणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/32178/explanation-by-paksane-sandhi-dilyas-me-grampanchayat-ladwin--former-union-minister-raosaheb-danve</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/32178/explanation-by-paksane-sandhi-dilyas-me-grampanchayat-ladwin--former-union-minister-raosaheb-danve</guid>
                <pubDate>Mon, 24 Jun 2024 00:02:35 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/raosaheb-danve-1.jpg"                         length="60556"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चांगला स्ट्राईक रेट याचा अर्थ हा नाही की….शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले</title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी आपण किती जागा लढवायच्या याची चाचपणी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरु आहेत. महायुतीला लोकसभा निवडणूकांत फटका बसवल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंतन सुरु केले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांद्यावर जाऊन बैठका घेणेही सुरु केले आहे. शरद पवार यांनी विधानसभेच्या 100 जागा लढविण्याचे वक्तव्य केले आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी असहमती व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी जागा वाटपावर अजून काही ठरलेले नाही सर्व काही 25 जूननंतर ठरेल असे म्हटल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.</p>
<p>शरद पवार हे महाविकास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/32031/changla-strike-rate-does-not-mean-that%E2%80%A6-sanjay-raut-clearly-said-in-response-to-sharad-pawar-s-statement"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/sanjay-raut-and-sharad-pawar.jpg" alt=""></a><br /><p>महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी आपण किती जागा लढवायच्या याची चाचपणी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरु आहेत. महायुतीला लोकसभा निवडणूकांत फटका बसवल्याने आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंतन सुरु केले आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांद्यावर जाऊन बैठका घेणेही सुरु केले आहे. शरद पवार यांनी विधानसभेच्या 100 जागा लढविण्याचे वक्तव्य केले आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी असहमती व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी जागा वाटपावर अजून काही ठरलेले नाही सर्व काही 25 जूननंतर ठरेल असे म्हटल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.</p>
<p>शरद पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत आणि मार्गदर्शक आहेत. परंतू अजून जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या आघाडीत सर्व बरोबरचे सहकाही आहे. लोकसभा निवडणूका सर्वांनी एकत्र मिळून लढून जिंकल्या आहेत. आमच्यात लवकरच चर्चा सुरु होणार आहे. 25 जूनला आमची एकत्र बैठक होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.</p>
<h3>25 जूनला दिल्लीत बैठक</h3>
<p>दिल्लीत 25 जूनला इंडिया आघाडीची एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाची देखील चर्चा होणार आहे. यावेळी शरद पवार साहेबांचा स्ट्राईक रेट जरूर चांगला आहे. परंतू त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी जादा जागा लढाव्यात. यावेळी शिवसेनेस जास्त टार्गेट करण्यात आले. आमच्या मुंबईच्या जागेवर डाका घातला. कोणालाच जागा कमी मिळाल्या नाहीत. आम्ही मान्सून अधिवेशनानंतर एकत्र बसून चर्चा करु असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.</p>
<h3>पुण्यात शरद पवार यांची बैठक</h3>
<p>पुणे शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख प्रशात जगताप यांनी सांगितले की शरद पवार यांनी या विधानसभा निवडणूकीत संपूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष आता अधिक आक्रमक धोरण स्वीकारणार आहे.लोकसभा निवडणूकात राष्ट्रवादी उबाठा आणि कॉंग्रेसच्या तुलनेत कमी जागा लढविण्यास तयार झाली होती. परंतू आता विधानसभा निवडणूकात हे धोरण चालणार नसल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.</p>
<h3>लोकसभेत विजयाने उत्साह वाढला</h3>
<p>लोकसभा निवडणूका महाविकास आघाडीतील घटकपक्षाने एकत्र येत लढा दिला होता. इंडिया आघाडीच्या फॉर्मुल्यानूसार उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक 21 जागांवर निवडणूक लढली. त्यांना 9 जागांवर विजय मिळाला. तर कॉंग्रेसला सर्वाधिक 13 जागांवर विजय मिळाला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला आहे. उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट कमी होता. कॉंग्रेसला मोठा विजय मिळाला. त्यांना केवळ चार जागा गमवाव्या लागल्या. तर शरद पवार यांनी 2 जागांचे नुकसान झाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/32031/changla-strike-rate-does-not-mean-that%E2%80%A6-sanjay-raut-clearly-said-in-response-to-sharad-pawar-s-statement</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/32031/changla-strike-rate-does-not-mean-that%E2%80%A6-sanjay-raut-clearly-said-in-response-to-sharad-pawar-s-statement</guid>
                <pubDate>Sat, 22 Jun 2024 14:02:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/sanjay-raut-and-sharad-pawar.jpg"                         length="87691"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरि महताब यांची नियुक्ती, काय असतात कर्तव्ये? घटना काय सांगते</title>
                                    <description><![CDATA[<p>18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. पहिल्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक होईल. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत प्रोटेम स्पीकर ( हंगामी अध्यक्ष ) म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरि महताब यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असे त्यांनी सांगितले. याशिवाय अधिवेशन काळात हंगामी अध्यक्ष यांना मदत करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 99 अन्वये राष्ट्रपतींनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टाई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांचीही नियुक्ती केली आहे. लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होईपर्यंत नवनिर्वाचित खासदारांना</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31868/appointment-of-bhartrihari-mahtab-as-protem-speaker-of-lok-sabha--what-are-the-duties"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/bhartrihari-mahtab.jpg" alt=""></a><br /><p>18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत आहे. पहिल्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक होईल. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत प्रोटेम स्पीकर ( हंगामी अध्यक्ष ) म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरि महताब यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली. महताब हे लोकसभा अध्यक्ष निवडीपर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील असे त्यांनी सांगितले. याशिवाय अधिवेशन काळात हंगामी अध्यक्ष यांना मदत करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 99 अन्वये राष्ट्रपतींनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टाई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांचीही नियुक्ती केली आहे. लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होईपर्यंत नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात यांची मदत होणार आहे.</p>
<h2>कोण आहेत भर्तृहरी महताब?</h2>
<p>भर्तृहरी महताब हे सात वेळा कटकचे खासदार होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बिजू जनता दल पक्ष सोडून भाजपमध्ये प्रव्र्ष केला होता. 2017 मध्ये लोकसभेतील चर्चेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता 18 व्या लोकसभेचे ते प्रोटेम स्पीकर असतील आणि नवीन खासदारांना शपथ देतील.</p>
<h2>काय आहेत प्रोटेम स्पीकरचे अधिकार ?</h2>
<p>लोकसभा निवडणूक जिंकून सत्तेवर येणाऱ्या पक्षाची किंवा आघाडीची पहिली प्राथमिकता प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करणे हीच असते.<br />
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत सर्वाधिक वेळ घालवलेल्या सदस्याची किंवा निवडून आलेल्या सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते.</p>
<p>सत्ताधारी पक्ष किंवा युती संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रोटेम स्पीकरचे नाव राष्ट्रपतींना पाठवते. त्यानंतर राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतात. जे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतात.</p>
<p>नवीन खासदारांना शपथ देण्यासाठी प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी सरकार आणखी दोन ते तीन नावांची शिफारस करते. नवीन सदस्यांना शपथ देण्याची प्रक्रिया सुमारे दोन दिवस सुरू असते. त्यानंतर सदस्य लोकसभा अध्यक्षांची निवड करतात.<br />
अध्यक्ष यांच्या निवडीनंतर राष्ट्रपती संयुक्तपणे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात.</p>
<h2>प्रोटेम स्पीकरची निवड कशी होते? घटनेत काय म्हटले आहे?</h2>
<p>लोकसभेचे पीठासीन अधिकारी या नात्याने अध्यक्ष यांना दैनंदिन कामकाजाशी संबंधित काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडावी लागतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 94 मध्ये असे म्हटले आहे की “जेव्हा लोकसभा विसर्जित केली जाते तेव्हा विसर्जनानंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत अध्यक्ष आपले पद सोडू शकत नाहीत.” 18 व्या लोकसभेत नवीन सभापती निवडून येईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रोटेम स्पीकरची निवड केली जाईल.</p>
<p>भारतीय राज्यघटनेत संसदेत प्रोटेम स्पीकर या पदाची तरतूद नाही. कायमस्वरूपी स्पीकरची निवड होईपर्यंत प्रोटेम स्पीकरची तात्पुरती नियुक्ती केली जाते. घटनेत प्रोटेम स्पीकर या पदाचा उल्लेख नसला तरी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या अधिकृत पुस्तिकेत प्रोटेम स्पीकरची नियुक्ती आणि शपथविधीचा उल्लेख आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31868/appointment-of-bhartrihari-mahtab-as-protem-speaker-of-lok-sabha--what-are-the-duties</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31868/appointment-of-bhartrihari-mahtab-as-protem-speaker-of-lok-sabha--what-are-the-duties</guid>
                <pubDate>Fri, 21 Jun 2024 02:02:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/bhartrihari-mahtab.jpg"                         length="93887"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Ram Mandir | अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? कुणी बिघडवला खेळ? अखेर सत्य समोर आले</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघाची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे अयोध्या आणि राम मंदिर याच मतदार संघात येत आहे. या मतदार भाजपचा झालेल्या पराभवाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. मात्र, अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण अखेर समोर आले आहे. येथे झालेल्या पराभवाचा पक्षाने आढावा घेतला. या आढावा अहवालातून एक मोठे कारण समोर आले आहे. रामनगरीतील पराभवाचे कारण फैजाबादमधील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांचे वक्तव्य आहे. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.</p>
<p>लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजपच्या बहुमतापासून दूर राहण्यापेक्षा फैजाबाद जागेवरील पक्षाच्या पराभवाची अधिक चर्चा झाली. रामनगरीत पराभवामागे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31739/ram-mandir"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/ayodhya-ram-mandir-.jpg" alt=""></a><br /><p>लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघाची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे अयोध्या आणि राम मंदिर याच मतदार संघात येत आहे. या मतदार भाजपचा झालेल्या पराभवाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. मात्र, अयोध्येतील भाजपच्या पराभवाचे कारण अखेर समोर आले आहे. येथे झालेल्या पराभवाचा पक्षाने आढावा घेतला. या आढावा अहवालातून एक मोठे कारण समोर आले आहे. रामनगरीतील पराभवाचे कारण फैजाबादमधील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांचे वक्तव्य आहे. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.</p>
<p>लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजपच्या बहुमतापासून दूर राहण्यापेक्षा फैजाबाद जागेवरील पक्षाच्या पराभवाची अधिक चर्चा झाली. रामनगरीत पराभवामागे फैजाबादमधील भाजप उमेदवार आणि माजी खासदार लल्लू सिंह यांच्या वक्तव्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. लल्लू सिंह यांनी संविधान बदलण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे दलित मते भाजपकडून गमावली गेल्याचे अहवालात म्हटले आहे.</p>
<p>लल्लू सिंह यांनी भाजपच्या 400 पार करण्याच्या नाऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना घटना दुरुस्तीबाबत एक विधान केले. त्यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते ‘272 चे सरकार बनते. पण 272 चे सरकार संविधानात दुरुस्ती करू शकत नाही. नवीन संविधान बनविण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आवश्यक आहे. त्यांच्या या विधानामुळे कुर्मी आणि मौर्य मतांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी भाजप विरोधात मतदान केले.</p>
<p>भाजपच्या पुनरावलोकन अहवालात लल्लू सिंह यांचे हे विधान पक्षासाठी घातक मानले गेले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप दलित मतदारांमधील आरक्षण रद्द करत असल्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याला बळ मिळाले असे म्हटले आहे. यासोबतच पेपरफुटीसारखे मुद्देही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशातील तरुणांमध्ये पेपरफुटी ही मोठी समस्या म्हणून समोर आली होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31739/ram-mandir</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31739/ram-mandir</guid>
                <pubDate>Thu, 20 Jun 2024 00:02:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/ayodhya-ram-mandir-.jpg"                         length="126985"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>काँग्रेसच्या व्होट बँकेनेच उबाठा गटाला तारलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा</title>
                                    <description><![CDATA[<p>शिवसेनेच्या 58 वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वरळीतील डोम सभागृहात झाला. यावेळी लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव गटाचा कोकणात आणि ठाणे जिल्ह्यात पराभव केला आहे. उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या काही जागा केवळ त्यांना मिळालेल्या एकगठ्ठा मताने मिळाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटापेक्षा आमच्या स्ट्राईक रेट चांगला असून उद्धव ठाकरे गटाला कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेने तारले असून ही व्होट बॅंक कायम सोबत राहील याची काहीही गॅरंटी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन वरळीत साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उबाठा हा खोटारडा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31725/congress-s-vote-bank-has-been-snatched-away"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/cm-eknath-shinde-criticized-uddhav-thackeray-shared-daregoan-video-latest-marathi-news.jpg" alt=""></a><br /><p>शिवसेनेच्या 58 वा वर्धापन दिनानिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वरळीतील डोम सभागृहात झाला. यावेळी लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव गटाचा कोकणात आणि ठाणे जिल्ह्यात पराभव केला आहे. उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या काही जागा केवळ त्यांना मिळालेल्या एकगठ्ठा मताने मिळाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटापेक्षा आमच्या स्ट्राईक रेट चांगला असून उद्धव ठाकरे गटाला कॉंग्रेसच्या व्होट बॅंकेने तारले असून ही व्होट बॅंक कायम सोबत राहील याची काहीही गॅरंटी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन वरळीत साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उबाठा हा खोटारडा पक्ष आहे. खोटं बोला आणि रडा. खरेतर यांचं नाव रडेगट असं नाव त्यांना दिलं पाहिजे. सारखा रडीचा डाव आता. जिंकलो जिंकलो ढोल पिटतायत. पण कुणाच्या जीवावर, शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिला का ? विचार करा. मुंबईत तुमच्या पेक्षा सव्वा दोन लाख जास्त मते आम्हाला मिळाली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हरले तर ईव्हीएमचा घोटाळा आणि जिंकले तर ईव्हीएमचा दोष नाही. जर ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते ना ? वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे. तसेच मेरिटवर झालेला विजय आहे. रवींद्र वायकर यांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का ? असा सवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.</p>
<h3>12 जागांवर हरले आणि जीत का जश्न ?</h3>
<p>वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आपलाच आहे. त्यामुळे त्यांनी <a href="https://www.tv9marathi.com/maharashtra/uddhav-thackerays-direct-challenge-to-narendra-modi-in-the-legislative-assembly-shivsena-58th-aanniversary-1220088.html"><strong>उबाठा</strong></a> ऐवजी दुसरं नाव ठेवलं पाहिजे. उठाबसा वगैरे…12 जागांवर हरलेली उबाठा जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग उपर. उबाठा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकली आहे. हे दुधखुळं पोरगंही सांगेल. काँग्रेसच्या वोट बँकेने त्यांना तारलंय. शिवेसना प्रमुखांचा विचार सोडणारे हे लाचार आहे. काँग्रेसला गाडण्याची भाषा बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढला होता. याच काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले कसे नाहीत. काँग्रेसला मतदान करणारे बाळासाहेबांच्या विचाराचे वारस कसे होऊ शकतात असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31725/congress-s-vote-bank-has-been-snatched-away</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31725/congress-s-vote-bank-has-been-snatched-away</guid>
                <pubDate>Wed, 19 Jun 2024 22:02:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/cm-eknath-shinde-criticized-uddhav-thackeray-shared-daregoan-video-latest-marathi-news.jpg"                         length="68353"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जणू काही 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले होते, संजय राऊत यांची जोरदार टीका</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई –</strong> शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिवस साजरा होत आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीत महायुतीचा मोठा पराभव झाल्यानंतर आणि महायुतीला सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर शिवसेनेचा हा वर्धापन सोहळा होत आहे. शिवसेनेते बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळूनही लोकसभेत उद्धव ठाकरे याच्या शिवसेना गटाने चांगली लढत दिली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने आज मुंबईत वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. शीव येथील षण्मुखानंद सभागृहातील ठाकरे गटाच्या वर्धापन सोहळ्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. महाराष्ट्र कधी परकीय आक्रमणापुढे झुकला नाही. गुजरातचे कोणी सोमे गोमे हवेश नवशे चारशे पार करायला आले होते. त्यांना रामभक्तांनी त्यांची जागा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31724/as-if-janmala-would-have-come-with-400-khulkhulas--sanjay-raut-s-strong-comment"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/sanjay-raut-news.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई –</strong> शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिवस साजरा होत आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीत महायुतीचा मोठा पराभव झाल्यानंतर आणि महायुतीला सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर शिवसेनेचा हा वर्धापन सोहळा होत आहे. शिवसेनेते बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळूनही लोकसभेत उद्धव ठाकरे याच्या शिवसेना गटाने चांगली लढत दिली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाने आज मुंबईत वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. शीव येथील षण्मुखानंद सभागृहातील ठाकरे गटाच्या वर्धापन सोहळ्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण केले. महाराष्ट्र कधी परकीय आक्रमणापुढे झुकला नाही. गुजरातचे कोणी सोमे गोमे हवेश नवशे चारशे पार करायला आले होते. त्यांना रामभक्तांनी त्यांची जागा दाखविली असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.</p>
<p>संजय राऊत पुढे म्हणाले की देशाच्या राजकारणात सध्या हीरो ठरलेले उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीला स्वागत केले. ते म्हणाले गुजरातच्या सोमेगोमे 400 पार करायला निघाले होते. जणू काही 400 हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ते जन्माला आल्यावर 400 खुळखुळे घेऊन आले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना पराभूत केलं. आम्हाला कुणी हरवू शकत नाही अशा फुशारक्या मारणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन वरळीच्या डोम सभागृहात सुरु आहे. त्याचा उल्लेख करुन संजय राऊत पुढे म्हणाले की ते डोम का काय आहे ना ? त्यामध्ये डोमकावळे जमले आहेत. आमचा 58 वा वाढदिवस आहे. त्यांचा अडीचवा वाढदिवस आहे.</p>
<h3>मोदी ब्रॅंडची…ब्रॅंडी झाली..</h3>
<p>शिवसेना प्रमुखांना वेळ जात नव्हती म्हणून शिवसेना स्थापन केलेली नाही. गुजरातचे सोमे गोमे हवशे गवशे आले आणि शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असे सांगत संजय राऊत पुढे म्हणाले की मी यासाठी म्हणतोय कारण छत्रपतींनी आपली मान दिल्लीच्या तख्तासमोर झुकवली नाही. त्याच महाराष्ट्राचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. भाजप आता ‘आभार यात्रा’ काढणार आहे म्हणे. कशासाठी महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. मोदींना बहुमत मुक्त केल्यामुळे 400 पार करणार होते. 200 केले म्हणून आभार मानता. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला बहुतेक. मोदी ब्रँड होता ना?. ब्रँडी झाली आहे बहुतेक त्याचा देशी ब्रँडी झाली आहे. या नशेत ते असे काही करत आहे. तुम्हाला नाकारलंय, लाथाडलंय आणि आभार कसले मानताय? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31724/as-if-janmala-would-have-come-with-400-khulkhulas--sanjay-raut-s-strong-comment</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31724/as-if-janmala-would-have-come-with-400-khulkhulas--sanjay-raut-s-strong-comment</guid>
                <pubDate>Wed, 19 Jun 2024 22:02:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/sanjay-raut-news.jpg"                         length="87343"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>उद्धव ठाकरे यांचं थेट मोदींनाच आव्हान… म्हणाले, विधानसभा आलीय, या…</title>
                                    <description><![CDATA[<p>शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने दोन्ही शिवसेना गटाचा मुंबईत दोन ठिकाणी स्वतंत्र वर्धापन साजरा करीत आहेत. लोकसभेच्या निवडणूकांत देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची पिछेहाट झाली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन साजरा होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला सर्व देशप्रेमींची मते मिळाली आहेत, त्यात मुस्लीम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत दलित आहेत असे मुंबईकर आहेत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.</p>
<p>काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा जरुर दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला त्यांचा मी आभार मानतो. परंतू मिंधे बोलले हा शहरी नक्षलवाद</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31723/uddhav-thackeray-said-modi-s-dance-call----said--assembly-hall--or"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/uddhav-thackeray-pti-i-1589782145-2.jpg" alt=""></a><br /><p>शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्याने दोन्ही शिवसेना गटाचा मुंबईत दोन ठिकाणी स्वतंत्र वर्धापन साजरा करीत आहेत. लोकसभेच्या निवडणूकांत देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची पिछेहाट झाली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन साजरा होत असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला सर्व देशप्रेमींची मते मिळाली आहेत, त्यात मुस्लीम आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत दलित आहेत असे मुंबईकर आहेत असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.</p>
<p>काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा जरुर दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला त्यांचा मी आभार मानतो. परंतू मिंधे बोलले हा शहरी नक्षलवाद आहे. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार जर तुम्हाला नक्षलवाद वाटतो. आणि लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का ? हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का?. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहे असा आरोप शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.</p>
<h3>मोदींना थेट आव्हान</h3>
<p>मिंध्यांना मी सांगतो, <a href="https://www.tv9marathi.com/maharashtra/sanjay-raut-slams-modis-400-par-announcement-at-shiv-sena-58th-anniversary-at-mumbai-1220075.html"><strong>भाजपला</strong></a> सांगतो, तुम्हाला आव्हान देतो, षंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यबाण न लावता, शिवसेनेचं नाव न लावता लढून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचाही फोटो वापरला नाही. कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर वापरणारच नाहीच. मोदींना आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत या मी आणि तुम्ही आहे. या षंढांना बाजूला करा. वडील चोरायची नाही, धनुष्यबाण चोरायचा नाही. मिंध्याच्या वडलांचे फोटो लावा आणि या समोर असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी थेट मिंध्यांना केला. माझ्या वडिलांचा फोटो लावून तुमचा स्ट्राईक रेट कसला सांगता असा सवालच उद्धव ठाकरे यांनी केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31723/uddhav-thackeray-said-modi-s-dance-call----said--assembly-hall--or</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31723/uddhav-thackeray-said-modi-s-dance-call----said--assembly-hall--or</guid>
                <pubDate>Wed, 19 Jun 2024 22:02:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/uddhav-thackeray-pti-i-1589782145-2.jpg"                         length="43670"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नारायण राणे यांची खासदारकी रद्द करा, विनायक राऊत यांची नोटीस; नोटिशीत काय म्हटलंय ?</title>
                                    <description><![CDATA[<p>रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार<br />
विनायक राऊत यांनी केली आहे.तसेच राणे यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. ॲड असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीता राऊत यांनी ही मागणी केली आहे.</p>
<p>भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे वि ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होता. लोकसभा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31660/narayan-rane-s-candidature-canceled--notice-given-to-vinayak-raut"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/rane-vs-vinayak-raut.jpg" alt=""></a><br /><p>रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार<br />
विनायक राऊत यांनी केली आहे.तसेच राणे यांच्यावर 5 वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. ॲड असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीता राऊत यांनी ही मागणी केली आहे.</p>
<p>भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे वि ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होता. लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाला आणि राणेंनी राऊत यांचा पराभव केला. मात्र, राणेंचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे. तेव्हापासूनच राणे व राऊत यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू असून राऊत यांनी आता ही नवी मागणी केली आहे.</p>
<p><strong>काय म्हटले आहे नोटिशीत ? </strong></p>
<p>निवडणूक प्रचार कालावधी हा 5 मे रोजी संपलेला असतानाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी सुद्धा सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. प्रचार संपलेला असतांनाही नारायण राणे समर्थक हे ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटिस मध्ये नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याच कडे निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली. त्याचाही उल्लेख नोटिशीमध्ये करण्यात आला आहे. नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिस मधून केलेली आहे.</p>
<p>केंद्रीय निवडणुक आयोगाने 7 दिवसात या नोटिस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.</p>
<p>अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत. हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिति असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31660/narayan-rane-s-candidature-canceled--notice-given-to-vinayak-raut</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31660/narayan-rane-s-candidature-canceled--notice-given-to-vinayak-raut</guid>
                <pubDate>Wed, 19 Jun 2024 14:01:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/rane-vs-vinayak-raut.jpg"                         length="62258"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Share Market Scam : नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा फायदा, 30 लाख कोटींच नुकसान, अमित शाहंवर आरोप काय?</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी बुडाल्याचा आरोप होतोय. कारण एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास ठेऊन गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. पण प्रत्यक्षात निकाल वेगळा लागला. काँग्रेसने सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे. “लोकसभा निवडणुकीत शेअर मार्केटमध्ये मानवी हस्तक्षेप करून घोटाळा करण्यात आलाय. यात एक्झिट पोलचा आधार घेतला गेला. 30 लाख कोटी रूपयांचा सामान्य भागधारकांचा तोटा झालाय. आम्ही सेबीचे अधिकारी भाटीया यांना तक्रार दिली आहे” असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.</p>
<p>“अमित शहा निवडणूक प्रचारात सांगत होते की शेअर्स खरेदी करा. ते कसे काय सांगू शकतात. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीला 521 कोटींचा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31531/share-market-scam--naidu-s-wife-s-521-crore-profit--30-lakh-crore-loss--what-is-amit-shahwar-s-allegation"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/share-market-scam.jpg" alt=""></a><br /><p>लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी बुडाल्याचा आरोप होतोय. कारण एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास ठेऊन गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. पण प्रत्यक्षात निकाल वेगळा लागला. काँग्रेसने सुद्धा हा मुद्दा लावून धरला आहे. “लोकसभा निवडणुकीत शेअर मार्केटमध्ये मानवी हस्तक्षेप करून घोटाळा करण्यात आलाय. यात एक्झिट पोलचा आधार घेतला गेला. 30 लाख कोटी रूपयांचा सामान्य भागधारकांचा तोटा झालाय. आम्ही सेबीचे अधिकारी भाटीया यांना तक्रार दिली आहे” असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.</p>
<p>“अमित शहा निवडणूक प्रचारात सांगत होते की शेअर्स खरेदी करा. ते कसे काय सांगू शकतात. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीला 521 कोटींचा फायदा यातून झालाय. ते आता का शांत आहेत?. सातव्या फेजचे मतदान सुरू असताना एक्झिट पोल कसे काय प्रसिद्ध केले गेले. सेबीने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायला हवी” अशी मागणी कल्याण बॅनर्जी यांनी केली. या घोटाळ्यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे आहेत, असा आरोप त्यांनी केला.</p>
<p><strong>सेबीकडे घोटाळ्याच्या चौकशीची मागणी</strong></p>
<p>“मोदी, शाह आणि निर्मला सितारामन हे तिघे दोषी आहेत. या तिघांनी राजीनामा दिला पाहिजे. घोटाळा झाला आहे तर राजीनामा द्यावा” अशी मागणी सागरीका घोष यांनी केली. “एक्झिट पोलच्या अगोदर मोदी व शहा यांनी आवाहन केले की तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवा. नफ्याच्या आशेपोटी गुंतवलेल्या 30 लाख कोटी रूपयांचा सामान्यांचा तोटा झाला. एक्झिट पोल करणा-या संस्था FII शी संबंधित आहेत. आम्ही या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी सेबीकडे केलीय” असं दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31531/share-market-scam--naidu-s-wife-s-521-crore-profit--30-lakh-crore-loss--what-is-amit-shahwar-s-allegation</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31531/share-market-scam--naidu-s-wife-s-521-crore-profit--30-lakh-crore-loss--what-is-amit-shahwar-s-allegation</guid>
                <pubDate>Tue, 18 Jun 2024 14:01:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/share-market-scam.jpg"                         length="43016"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘मतमोजणीवेळी ‘त्या’ अधिकारी वारंवार बाथरुममध्ये का जात होत्या?,’ ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खरमरीत सवाल</title>
                                    <description><![CDATA[<p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निकालाची जगभर चर्चा सुरु आहे. टेस्ला आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील निवडणूकीच्या संदर्भ घेऊन<strong> EVM</strong> च्या धोक्याचा इशाऱ्याचे ट्वीट केले होते. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टॅग करीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या मतमोजणीनंतर आलेल्या बातमीचा संदर्भ देत ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असल्याचे म्हटले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निवडणूकीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.</p>
<p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31450/-did-tya-adhikari-frequently-go-to-the-bathroom-during-voting---thackeray-raised-a-big-question"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/uddhav-thackeray-.jpg" alt=""></a><br /><p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निकालाची जगभर चर्चा सुरु आहे. टेस्ला आणि एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील निवडणूकीच्या संदर्भ घेऊन<strong> EVM</strong> च्या धोक्याचा इशाऱ्याचे ट्वीट केले होते. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टॅग करीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या मतमोजणीनंतर आलेल्या बातमीचा संदर्भ देत ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असल्याचे म्हटले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या निवडणूकीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.</p>
<p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा विजय झाला आहे. आधी ईव्हीएम मोजणीनंतर एक मतांनी अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला होता. त्यानंतर फेर मतमोजणीची मागणी झाली. अखेर पोस्टल बॅलेटमध्ये रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आले. त्यातच आता शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या अधिकृत प्रतिनिधी ऐवजी भलत्याच व्यक्तीचा शिरकाव झाल्याचा आरोप केला होता. त्याने मोबाईलद्वारे ईव्हीएमला अनलॉक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हॅक होऊ शकत नसल्याचा खुलासा केला होता.</p>
<h3>सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत ?</h3>
<p>लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळी सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही 4 जूनच्या घटनेचा सीसीटीव्ही फूटेजची मागणी केली आहे. परंतू निवडणूक आयोग आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज देण्यास नकार दिला आहे. जर तुमची निवडणूक मतमोजणी पारदर्शक असेल तर सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मतमोजणी केंद्रात ज्या प्रतिनिधीच्या मोबाईल फोनवरुन गडबड झाली त्या प्रकरणाची फिर्याद पोलिसांना दिल्यानंतर 10 दिवसांनी कारवाई झाली असल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. तक्रार 4 जूनला झाली आणि कारवाई दहा दिवसांनी केली गेली. त्याकाळात मोबाईल देखील बदलला असावा असा आमचा स्पष्ठ आरोप असल्याचे परब यांनी सांगितले.</p>
<h3>निवडणूक निर्णय अधिकारी वारंवार</h3>
<p>जेव्हा चुकीचा प्रतिनिधी मोबाईल घेऊन घुसल्याचे उघड झाले तेव्हा गोंधळ उडाला. तक्रारीनंतर त्याचा जर मोबाईल जप्त झाला. तर त्याने उर्वरित डिटेल्स त्या प्रतिनिधीने कोणत्या मोबाईल फोनवरुन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वारंवार बाथरुमला जात होत्या. त्यावेळी कोणाशी तरी बोलत होत्या. 19 व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीचे आकडे जाहीर केले जात होते. नंतर दोन्ही उमेदवारांचे आकडे जवळ आले तसे माहीती देणे बंद झाले ते थेट 22 व्या फेरी वेळीच आकडे जाहीर केले. अंतिम निर्णय जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ( आरओ ) कोणाला काही हरकत आहे का ? असे विचारले नाही थेट निकाल जाहीर केला असे अनिल परब यांनी सांगितले. याबाबत आमच्याकडे सगळी माहीती आलेली आहे, आम्ही या निकालाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.</p>
<h3>आयोगानेच सुमोटा कारवाई करावी</h3>
<p>खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते ॲड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत 19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी <a href="https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-police-recruitment-2024-candidates-are-afraid-of-rain-first-use-rfid-technology-1218811.html"><strong>पारदर्शकता</strong></a> बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितले. निवडणूक आयोगाने याची सुमोटो ॲक्शन केली पाहीजे अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31450/-did-tya-adhikari-frequently-go-to-the-bathroom-during-voting---thackeray-raised-a-big-question</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31450/-did-tya-adhikari-frequently-go-to-the-bathroom-during-voting---thackeray-raised-a-big-question</guid>
                <pubDate>Mon, 17 Jun 2024 20:01:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/uddhav-thackeray-.jpg"                         length="78435"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Amol Kirtikar : 19 व्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रात काय घडलं? अमोल किर्तीकर म्हणाले…VIDEO</title>
                                    <description><![CDATA[<p>उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येत आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. स्वत: अमोल किर्तीकर या निवडणूक निकालाबद्दल व्यक्त झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देण्याात येणार आहे.</p>
<p>“4 जूनला त्या ठिकाणी मी उशिरा पोहोचलो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलय, ते मिळत नाहीय. तो पर्यंत काहीही</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31424/amol-kirtikar--19-what-happens-after-the-turn-of-matmojani"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/amol-kirtikar-ravindra-waykar-mumbai-north-west-lok-sabha-constituency1.jpg" alt=""></a><br /><p>उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येत आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. स्वत: अमोल किर्तीकर या निवडणूक निकालाबद्दल व्यक्त झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देण्याात येणार आहे.</p>
<p>“4 जूनला त्या ठिकाणी मी उशिरा पोहोचलो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलय, ते मिळत नाहीय. तो पर्यंत काहीही बोलू शकत नाही. 19 व्या फेरीनंतर बराचवेळ घोषणा झाली नाही. तिथली परिस्थिती तशीच होती. 19 व्या राऊंडनंतर फायलन टॅली येईपर्यत घोषणा का झाली नाही? प्रत्येक राऊंडनंतर घोषणा होते. 48 मतांनी पराजय झाला की, 48 मतांनी पराभव केलाय याच उत्तर सीसीटीव्ही फुटेजमधूनच मिळू शकतं” असं अमोल किर्तीकर म्हणाले.<br />
<br />
<strong>‘ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल’</strong></p>
<p>तुम्ही त्यावेळी लेखी आक्षेप का नाही घेतला? यावर अमोल किर्तीकर म्हणाले की, “चीफ इलेक्शन एजंट सर्वांशी व्यक्तीगत पातळीवर बोलले. पूर्नमतमोजणीची मागणी करताना लेखी आक्षेप घेतला. तो मान्य केला नाही. आरओंनी मौखिक आदेश दिले होते की नाही? ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. काहीतरी काळबेर आहे की काय असं वाटतय” असं अमोल किर्तीकर म्हणाले. “मला ज्यांनी मतदान केलय, त्यांना आक्षेप आहे. त्यांचा संशय दूर होत नाही, तो पर्यंत, आम्ही शेवटपर्यत उभे राहू” असं अमोल किर्तीकर म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31424/amol-kirtikar--19-what-happens-after-the-turn-of-matmojani</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31424/amol-kirtikar--19-what-happens-after-the-turn-of-matmojani</guid>
                <pubDate>Mon, 17 Jun 2024 16:02:03 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/amol-kirtikar-ravindra-waykar-mumbai-north-west-lok-sabha-constituency1.jpg"                         length="54918"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप</title>
                                    <description><![CDATA[<p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा निकाल वादात सापडला आहे. या लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आहे. EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कालच केलेल्या आरोपानंतर या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. परंतू त्यानंतरही या मतमोजणी केंद्रात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रतिनिधीकडे असलेल्या मोबाईल फोनवरुन गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुंबई उत्तर पश्चिम निकालावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.</p>
<p>उत्तर पश्चिम लोकसभा मतदार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/31423/%C2%A0"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-06/aaditya-thackeray6.jpg" alt=""></a><br /><p>मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा निकाल वादात सापडला आहे. या लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आहे. EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कालच केलेल्या आरोपानंतर या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. परंतू त्यानंतरही या मतमोजणी केंद्रात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रतिनिधीकडे असलेल्या मोबाईल फोनवरुन गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुंबई उत्तर पश्चिम निकालावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.</p>
<p>उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाप्रमाणे देशातील इतरही मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केलेला आहे. तर खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी पारदर्शकता बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितल्याचे अनिल परब यांनी सांगितले.</p>
<h3>650 मतांचा फरक</h3>
<p>सहा मतदार संघ असले तर एआरओच्या टेबल जवळ एक लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी असतो. एक राऊंड झाल्यानंतर त्यांच्या समोर 14 टेबलची टॅली करुन हे आकडे सांगितले जातात. नंतर आरओला <a href="https://www.tv9marathi.com/national/action-taken-against-government-officials-who-come-late-to-the-office-central-government-issued-an-order-1218698.html"><strong>आकडे</strong></a> दिले जातात. परंतू यावेळी आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर होते. मोठी जाळी होती. ते काय करत आहेत हे कळत नव्हते असेही अनिल परब म्हणाले. उमेदवाराला 17 c फॉर्म दिला जातो. हा प्रत्येक ईव्हीएम मतपेटीत किती मते असतात ? ती मोजल्यानंतर ती किती आहेत ती दाखवून सही घेतली जाते. केंद्राध्यक्षाची सही करुन या 17 c फॉर्म प्रमाणे मते मतपेटीत मोजली का याची टॅली आपल्याला नंतर करुन खातर जमा करता येते. त्यानंतर फॉर्म 17 c part 2 हा देखील देण्याची तरदूत असते. यावेळी हा फॉर्म 17 c part 2 मागणी करुन ही दिला नाही. या फॉर्मद्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आमच्या आणि त्यांच्या मतात आमच्या मोजणीनूसार 650 मतांचा फरक आलेला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.<br />
22 ते 23 फेरीनंतर एकदम मते जाहीर केल्याचे अनिल परब यांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/31423/%C2%A0</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/31423/%C2%A0</guid>
                <pubDate>Mon, 17 Jun 2024 16:02:03 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-06/aaditya-thackeray6.jpg"                         length="77984"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        