<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/category/4/pune" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>पुणे - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/category/4/rss</link>
                <description>पुणे RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>तुळजापूरजवळ महिला भाविकांना लुटले</title>
                                    <description><![CDATA[<p>तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना बंदुकीचा धाक दाखवत व चाकूने हल्ला करून सोन्याचे दागिने व रोकड चोरटय़ांनी लुटून नेली. चोरटय़ांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.</p>
<p>निलंगा येथील काही महिला भाविक कुटुंबीयासह मोटारीने तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. तुळजापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर चंद्रलोक हॉटेलजवळ महिला भाविक थांबल्या असता दबा धरून बसलेल्या 4-5 जणांच्या टोळीने थांबलेल्या मोटारीची चावी काढून घेत बंदूक व चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने व पुरुषांकडील रोकड काढून घेतली. जाताना या चोरटय़ांनी तीन महिलांवर चाकूने वार केले. या चोरांच्या टोळीने याचदरम्यान आणखीन काही महिला भाविकांवर हल्ला करून दागिने लुटल्याचे घटनास्थळावरील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81616/tuljapurnear-mahila-bhavikanna-lutale"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/crime-1.jpg" alt=""></a><br /><p>तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना बंदुकीचा धाक दाखवत व चाकूने हल्ला करून सोन्याचे दागिने व रोकड चोरटय़ांनी लुटून नेली. चोरटय़ांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने महिला भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.</p>
<p>निलंगा येथील काही महिला भाविक कुटुंबीयासह मोटारीने तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. तुळजापूरपासून 4 किलोमीटर अंतरावर चंद्रलोक हॉटेलजवळ महिला भाविक थांबल्या असता दबा धरून बसलेल्या 4-5 जणांच्या टोळीने थांबलेल्या मोटारीची चावी काढून घेत बंदूक व चाकूचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने व पुरुषांकडील रोकड काढून घेतली. जाताना या चोरटय़ांनी तीन महिलांवर चाकूने वार केले. या चोरांच्या टोळीने याचदरम्यान आणखीन काही महिला भाविकांवर हल्ला करून दागिने लुटल्याचे घटनास्थळावरील पुजारी जीवनराजे अमृतराव यांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81616/tuljapurnear-mahila-bhavikanna-lutale</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81616/tuljapurnear-mahila-bhavikanna-lutale</guid>
                <pubDate>Thu, 30 Oct 2025 12:07:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/crime-1.jpg"                         length="45461"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गुंड नीलेश घायवळ लंडनमध्येच; यूके हायकमिशनने दिली माहिती</title>
                                    <description><![CDATA[<p>कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा समोर आला आहे. हिंदूस्थानातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.</p>
<p>घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81615/gund-nilesh-ghaywal-london-madhyamich"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/nilesh-ghaiwal-3.jpg" alt=""></a><br /><p>कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा समोर आला आहे. हिंदूस्थानातील ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.</p>
<p>घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवळला लवकरच देशात आणले जाईल, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. नीलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली आहे. घायवळ याने ‘गायवळ’ या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81615/gund-nilesh-ghaywal-london-madhyamich</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81615/gund-nilesh-ghaywal-london-madhyamich</guid>
                <pubDate>Thu, 30 Oct 2025 12:07:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/nilesh-ghaiwal-3.jpg"                         length="76336"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘स्वाभिमानी’ 3400 रुपये पहिल्या उचलीवर ठाम! ऊसदराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात</title>
                                    <description><![CDATA[<p>राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होत असला तरी अहिल्यानगर जिह्यात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र भूमिकेनंतर प्रशासनाने अखेर हस्तक्षेप करत शुक्रवारी (दि. 31) सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी दिली आहे.</p>
<p>दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाम भूमिका घेत मागील हंगामातील फरक 200 रुपयांप्रमाणे दिल्याशिवाय आणि चालू हंगामाची पहिली उचल 3400 रुपये प्रतिटन ठरवल्याशिवाय ऊसतोडणी सुरू करू देणार नाही, असा इशार दिला आहे. या बैठकीसाठी साखर प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी सर्व साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81614/-swabhimani--was-the-first-to-lift-rs-3400"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/sugarcane-111.jpg" alt=""></a><br /><p>राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होत असला तरी अहिल्यानगर जिह्यात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र भूमिकेनंतर प्रशासनाने अखेर हस्तक्षेप करत शुक्रवारी (दि. 31) सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी दिली आहे.</p>
<p>दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाम भूमिका घेत मागील हंगामातील फरक 200 रुपयांप्रमाणे दिल्याशिवाय आणि चालू हंगामाची पहिली उचल 3400 रुपये प्रतिटन ठरवल्याशिवाय ऊसतोडणी सुरू करू देणार नाही, असा इशार दिला आहे. या बैठकीसाठी साखर प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी सर्व साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत 2025–26 हंगामासाठी ऊसदर निश्चित केला जाणार असून, जिह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.</p>
<p>कारखानदार आणि साखर व्यवस्थापन मंडळ यांच्यात संगनमत होऊन दर जाणीवपूर्वक कमी ठेवले जात आहेत. सध्या साखरेचा भाव 4200 ते 4400 प्रतिक्विंटल असून, कारखानदारांना विक्रमी नफा मिळत असताना शेतकऱयांना न्याय्य दर दिला जात नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. खत, मजुरी, वाहतूक आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पहिली उचल 3400 आणि अंतिम दर 3600 प्रतिटन मिळालाच पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे.</p>
<p><strong>उसाची ‘सोन्याची’ कांडी</strong></p>
<p>यावर्षी उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले असून, साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी घाई न करता चांगला दर व वजनाची खात्री देणाऱया कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी केले आहे. यावर्षी उसाची कांडी ही सोन्याची कांडी ठरणार आहे, असे ते म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81614/-swabhimani--was-the-first-to-lift-rs-3400</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81614/-swabhimani--was-the-first-to-lift-rs-3400</guid>
                <pubDate>Thu, 30 Oct 2025 12:06:59 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/sugarcane-111.jpg"                         length="35953"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ऊसदर आंदोलन चिघळले; तीन वाहने पेटविली, शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील घटना</title>
                                    <description><![CDATA[<p>ऊसदराच्या तोडग्यासाठी आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.</p>
<p>शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसदरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. उसाचा भाव निश्चित करून हा भाव मिळवण्यासाठी शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यात विविध मार्गांनी आणि विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला, तरी कर्नाटकात सुरू झालेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81613/stomach-movement-chighalle"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/aandolan.jpg" alt=""></a><br /><p>ऊसदराच्या तोडग्यासाठी आंदोलन सुरू असतानाच कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.</p>
<p>शिरोळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊसदरासाठी विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. उसाचा भाव निश्चित करून हा भाव मिळवण्यासाठी शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यात विविध मार्गांनी आणि विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असला, तरी कर्नाटकात सुरू झालेल्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमाभागातील साखर कारखान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.</p>
<p>कोल्हापूर जिह्यात कारखान्यांकडून 1 नोव्हेंबरपूर्वीच हंगाम सुरू करण्यात येत आहे. उसाची पळवापळवी टाळण्यासाठी कारखान्यांनी मुदतीपूर्वीच कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संघटनांनी केलेल्या दराच्या मागणीवर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. कारखानदारांकडून केवळ एफआरपीची रक्कम जाहीर केली जात असल्याने शिवाय गेल्या हंगामातील जादाची बिले देण्याबाबत कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन उग्र स्वरूप धारण करत आहे.</p>
<p>कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील मार्गावर मंगळवारी (दि. 28) ऊस वाहतूक करणारे तीन ट्रक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिले. यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक रोखणे, कारखान्यासमोर आंदोलन करणे, वाहने पेटवून देणे अशा स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्यापूर्वी ऊसदराचा प्रश्न मार्गी लावून हंगाम सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी शेतकऱयांमधून होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81613/stomach-movement-chighalle</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81613/stomach-movement-chighalle</guid>
                <pubDate>Thu, 30 Oct 2025 12:06:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/aandolan.jpg"                         length="43616"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या; ‘मॅग्मो’च्या वतीने उद्या राज्यव्यापी आंदोलन काळ्या फिती लावून काम करणार</title>
                                    <description><![CDATA[<p>फलटण जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या आहे का हत्या, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्यात यावी. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी 31 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही सरकारने मागण्यांवर कार्यवाही केली नाही तर भविष्यात शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो) संघटनेच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे.</p>
<p>मॅग्मोच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फटलणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूमुळे राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथमदर्शनही ही आत्महत्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81612/female-doctor-commits-suicide-in-phaltan"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/pune-crime-.jpg" alt=""></a><br /><p>फलटण जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या आहे का हत्या, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करण्यात यावी. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी 31 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही सरकारने मागण्यांवर कार्यवाही केली नाही तर भविष्यात शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅग्मो) संघटनेच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे.</p>
<p>मॅग्मोच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फटलणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूमुळे राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथमदर्शनही ही आत्महत्या वाटत असली तरी हत्याच असल्याचा संशय आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांवर दोषारोप होत असल्याने चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस पथक स्थापन करण्यात यावे. संबंधित महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या तक्रारपत्रात उल्लेख असणाऱयांवर गुन्हे दाखल करावेत. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर शिक्षा सुनावली जावी. यासंदर्भात दहा दिवसांत कार्यवाही झाली नाही तर वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.</p>
<p>सांगली जिल्हा मॅग्मोच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. विवेक पाटील, डॉ. नितीन चिवटे, डॉ. संदीप कोडाग, डॉ. जयंत सावंत, डॉ. अभिजित सांगलीकर, डॉ. अजय भोसेकर, डॉ. आशा चौगुले आदी उपस्थित होते.</p>
<p><strong>फलटणच्या घटनेची सखोल चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मागणी</strong></p>
<p>फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, असा प्रश्न उपस्थित करीत या घटनेची सखोल चौकशी करा, अशी मागणी आज शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. डॉक्टर महिलेल्या हातावरील अक्षर आणि तिचे हस्ताक्षर यात तफावत असल्याचे पह्टोच त्यांनी दाखवले.</p>
<p>पीडितेच्या हातावर निरिक्षक शब्द लिहिलाय. त्याला पहिली वेलांटी आहे आणि मुलीच्या पत्रात दुसरी वेलांटी आहे. पत्रात तब्बल 9 वेळा निरीक्षक असं लिहिलं आहे, असा मुद्दा अंधारे यांनी नमूद केला. पोलिसांना मुलीचा मोबाईल किंवा सीडीआर लीक करण्याचा अधिकार कोणी दिला? महिला आयोगाने कोणत्या अधिकारावर त्याबाबत बोलणी केली. त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला पदावर ठेवावं की नाही याचा विचार करायला हवा असा टोलाही त्यांनी लगावला. या प्रकरणात नावे समोर आलेल्या बडय़ा नेत्यांमध्ये काही संवाद झाला आहे की नाही? याबाबत महिला आयोग काही सांगत नाही, मात्र मृत्यू झालेल्या मुलीच्या सीडीआरबद्दल कशा बोलल्या असा सवालही त्यांनी केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81612/female-doctor-commits-suicide-in-phaltan</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81612/female-doctor-commits-suicide-in-phaltan</guid>
                <pubDate>Thu, 30 Oct 2025 12:06:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/pune-crime-.jpg"                         length="50192"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख</title>
                                    <description><![CDATA[<p>पुणे बाजार समितीतने वाहन प्रवेश शुल्क वसुलीसाठी 11 लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका दिला. मात्र, हे अकरा लोक केवळ कागदावर दाखवून शेतमाल आवक नोंद करणाऱ्या ठेकेदाराकडून त्या त्यांचे काम करून घेतले. त्यामुळे गेल्या संचालक मंडळाच्या 28 महिन्यात सुमारे काम न करता 70 लाख रुपये ठेकेदाराच्या घशात घातले आहेत. संचालक मंडळाला सरकार पाठीशी घालत असल्यामुळे या घोटाळ्या मागील सूत्रधाराचा शोध कोण घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.</p>
<p>पुणे बाजार समितीकडून बाजारात वाहनांना प्रवेश देण्याच्या नावाखाली पाच तासांसाठी प्रति वाहन दहा रुपये शुल्क आकारले जाते. हे पैसे गोळा करण्यासाठी बाजार समितीने कोणतीही स्पर्धा न करता बिबवेवाडी येथील मे मोरया एंन्टरप्रायजेस यांना 11 लोकांचा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81542/scam-in-pune-market-committee-vehicle-entry-tender"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/pune-news1.jpg" alt=""></a><br /><p>पुणे बाजार समितीतने वाहन प्रवेश शुल्क वसुलीसाठी 11 लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका दिला. मात्र, हे अकरा लोक केवळ कागदावर दाखवून शेतमाल आवक नोंद करणाऱ्या ठेकेदाराकडून त्या त्यांचे काम करून घेतले. त्यामुळे गेल्या संचालक मंडळाच्या 28 महिन्यात सुमारे काम न करता 70 लाख रुपये ठेकेदाराच्या घशात घातले आहेत. संचालक मंडळाला सरकार पाठीशी घालत असल्यामुळे या घोटाळ्या मागील सूत्रधाराचा शोध कोण घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.</p>
<p>पुणे बाजार समितीकडून बाजारात वाहनांना प्रवेश देण्याच्या नावाखाली पाच तासांसाठी प्रति वाहन दहा रुपये शुल्क आकारले जाते. हे पैसे गोळा करण्यासाठी बाजार समितीने कोणतीही स्पर्धा न करता बिबवेवाडी येथील मे मोरया एंन्टरप्रायजेस यांना 11 लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका देऊन टाकला. यापूर्वी हा ठेका दुसऱ्या ठेकेदाराने होता. त्या अकरा लोकांकडून बाजार समितीच्या गुळ भुसार विभागाच्या गेट क्रमांक 1,2,4,5,9,10 मधुन शेतीमाल घेवून येणाऱ्या वाहनांकडून प्रवेश फी वसूल करण्याची जबाबदारी दिली. मात्र, प्रत्यक्षात अकरा लोक केवळ कगदरवच आहेत. बाजार समितीत स्पिंडल वर्ल्ड या ठेकेदारामार्फत फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, भुसार बाजारात गेटवर संगणकावर शेतमालाची आवक नोंद केली जाते. स्पिंडल वर्ल्ड ठेकेदाराकडील कचऱ्यांकडूनच संगणकावर आवक घेणे आणि वाहन प्रवेश शुल्क वसूल अशी दोन्ही कामे केली जातात. त्यामुळे बिबवेवाडीतील मे मोरया एंन्टरप्रायजेस या ठेकेदाराला अकरा लोकांचा पगार काही न करता मिळत आहे.</p>
<p><strong>वाहनचालंकडून मनमानी लूट</strong></p>
<p>गेट एन्ट्री शुल्क पावती पाच तासांसाठी असते. पहिल्या पाच तासांसाठी दहा रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर किती पैसे करायचे याचा कुठेही उल्लेख नाही. परराज्यातील वाहन चालकांना मराठी भाषा वाचता येत नाही. त्यामुळे मराठीतील 10 हिंदीत 90 सांगतात आणि पाच तासानंतर अगदी 100 ते 300 रुपये मनमानी पद्धतीने पैसे घेतात. तर महाराष्ट्रातील वाहन चालकांना मराठी भाषा लिहिता वाचता येत असली तरी पाच तासानंतर किती शुल्क हे नमूद केले नसल्याने त्यांच्याकडूनही मनमानी पद्धतीने वसुली केली जात आहे. यातून अशा पद्धतीने महिन्याला लाखो रुपयांचा घोटाळा होत आहे.</p>
<p><strong>बिबवेवाडीतील ठेकेदारामागे संचालक कोण?</strong></p>
<p>संचालक मंडळ आल्यापासून कोणाच्या ना कोणाच्या जवळील लोकांना मनमानी पद्धतीने ठेके दिले आहेत. कोणतीही स्पर्धा न करता बिबवेवाडी येथील मे मोरया एंन्टरप्रायजेस यांना ११ लोकांचा मनुष्यबळ पुरवण्याचा ठेका दिला. बिबवेवाडीतील या ठेकेदाराला काम न करता बिले अदा होत आहेत. त्यामुळे बिबवेवाडीतील ठेकेदारामागे संचालक कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.</p>
<p>वाहन प्रवेश शुल्क वसूल करणे आणि आवक नोंद कामकाज ही दोन स्वतंत्र कामे आहेत. दोन्ही कामे नक्की कोण करत आहेत, याची पाहणी केली जाईल. याबाबत कर्मचारी हजेरी कामका अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना ठेवण्यास सांगितला आहे.<br />
<strong>– डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे</strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81542/scam-in-pune-market-committee-vehicle-entry-tender</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81542/scam-in-pune-market-committee-vehicle-entry-tender</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 12:06:48 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/pune-news1.jpg"                         length="91140"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार</title>
                                    <description><![CDATA[<p>कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात फरार झालेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा युरोपात वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. बनावट पारपत्रांच्या आधारे तो परदेशात गेल्याचे तपासात उघड झाले आहे.</p>
<p>घायवळविरुद्ध पूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बजावली असून इंटरपोललाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नीलेश घायवळसह भाऊ सचिन घायवळ याच्याविरुद्ध नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. मात्र सचिन घायवळ सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.</p>
<p>नीलेश</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81541/correspondence-to-pune-police--british-high-commissioner-for-extradition-of-gund-nilesh-ghaywal"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/nilesh-ghaiwal-2.jpg" alt=""></a><br /><p>कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात फरार झालेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा युरोपात वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला देशात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. बनावट पारपत्रांच्या आधारे तो परदेशात गेल्याचे तपासात उघड झाले आहे.</p>
<p>घायवळविरुद्ध पूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बजावली असून इंटरपोललाही याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नीलेश घायवळसह भाऊ सचिन घायवळ याच्याविरुद्ध नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. मात्र सचिन घायवळ सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.</p>
<p>नीलेश घायवळने ‘घायवळ’ऐवजी ‘गयावळ’ नावाने बनावट कागदपत्रे तयार करून अहिल्यानगर येथून ‘तत्काळ’ प्रक्रियेतून पारपत्र मिळवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या पारपत्राच्या आधारे तो 90 दिवसांच्या व्हिसावर परदेशात गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत खून, खंडणी, संघटित गुन्हेगारी यांसह आठ गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या प्रत्यार्पणानंतर या प्रकरणांच्या तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81541/correspondence-to-pune-police--british-high-commissioner-for-extradition-of-gund-nilesh-ghaywal</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81541/correspondence-to-pune-police--british-high-commissioner-for-extradition-of-gund-nilesh-ghaywal</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 12:06:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/nilesh-ghaiwal-2.jpg"                         length="76336"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाला अखेर सुरुवात; कोल्हापुरात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर टिकेची झोड</title>
                                    <description><![CDATA[<p>छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही वाघनखे सातारा, नागपूरनंतर महिनाभरापूर्वी कोल्हापुरात दाखल झाली होती. पण मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नसल्याने अखेर सकाळी घाईघाईत उद्घाटनाचे शासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले.</p>
<p>या शिवशौर्य शस्त्रगाथा प्रदर्शन उद्घाटनासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर वगळता मान्यवर उपस्थित नसल्याने व्यासपीठावरील खुर्च्या काढण्यात आल्या. तर व्यासपीठासमोरील मोकळ्या खुर्च्या भरण्यासाठी शेजारच्या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना अक्षरशः प्रॅक्टिकल सोडून जबरदस्तीने कार्यक्रमासाठी बसवण्याची नामुष्कीजनक वेळ प्रशासनावर आली. त्यात हा कार्यक्रम लोकाभिमुख करणे अपेक्षित असताना कोल्हापूरकरांनादेखील निमंत्रण नसल्याने खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही ऑनलाईन हजेरीच लावणे पसंद केले. एकंदरीत सांस्कृतिक</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81529/shivshastra-shauryagatha-exhibition-finally-begins"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/shivshasktra.jpg" alt=""></a><br /><p>छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही वाघनखे सातारा, नागपूरनंतर महिनाभरापूर्वी कोल्हापुरात दाखल झाली होती. पण मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नसल्याने अखेर सकाळी घाईघाईत उद्घाटनाचे शासकीय सोपस्कार पार पाडण्यात आले.</p>
<p>या शिवशौर्य शस्त्रगाथा प्रदर्शन उद्घाटनासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर वगळता मान्यवर उपस्थित नसल्याने व्यासपीठावरील खुर्च्या काढण्यात आल्या. तर व्यासपीठासमोरील मोकळ्या खुर्च्या भरण्यासाठी शेजारच्या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना अक्षरशः प्रॅक्टिकल सोडून जबरदस्तीने कार्यक्रमासाठी बसवण्याची नामुष्कीजनक वेळ प्रशासनावर आली. त्यात हा कार्यक्रम लोकाभिमुख करणे अपेक्षित असताना कोल्हापूरकरांनादेखील निमंत्रण नसल्याने खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही ऑनलाईन हजेरीच लावणे पसंद केले. एकंदरीत सांस्कृतिक संचालनालय विभागासह पुरातत्व विभागाच्या गलथान कारभारावरून टिकेची झोड उठू लागली आहे.</p>
<p>बहुचर्चित ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला. कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे गेल्या महिन्यात 28 सप्टेंबरला ही वाघनखे आणण्यात आली आहेत. मात्र, उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने ही वाघनखे कधी पाहायला मिळतील याची शाश्वती नसल्याने, काही विद्यार्थ्यांना परत फिरावे लागले होते; पण आज अचानक उद्घाटनाचा घाट घालण्यात आला. वेळेत बदलही करण्यात आला.त्यानुसार ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया ऍण्ड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली ‘वाघनखे’ याचे उद्घाटन सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ऐनवेळी सांगण्यात आल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. मंत्री हसन मुश्रीफ हे कॅबिनेट बैठकीसाठी रात्रीच मुंबईला रवाना झाले असून, जिह्यातील महायुतीचा एकही खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित नव्हता.</p>
<p><strong>माईकचा आवाज ‘गायब’</strong><br />
राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलत असताना माईकचा आवाजच आला नाही. त्यामुळे ते काय बोलले हे कोणाला समजले नाही. त्यात आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे व्यासपीठावरून भाषण करताना त्यांच्याही माईकची समस्या दिसून आली. पुरातत्व आणि सांस्कृतिक विभागाच्या या ढिसाळ आणि गचाळ नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, पालकमंत्री आबिटकर यांनी हा कार्यक्रम औपचारिक असल्याचे सांगत, सोमवारनंतर सर्वांसाठी व्यवस्थित नियोजन केले जाईल, असे सांगितले. तसेच नियोजनात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. या कार्यक्रमात पुरातत्व आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी एकूणच कार्यक्रमाविषयी माहिती दिली. मात्र, ढिसाळ नियोजनाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘हात जोडत’ त्यांनी पळ काढला.</p>
<p><strong>महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जबरदस्ती आणले</strong><br />
या संपूर्ण कार्यक्रमात पुरातत्त्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभार पाहायला मिळाला.आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे प्रेक्षकांच्या रिकाम्या खुर्च्यांवर बसण्यासाठी महाविद्यालयाच्या मुलांना जबरदस्तीने बोलावून आणले. काही विद्यार्थी प्रदर्शन पाहत असताना त्यांना सुरक्षा यंत्रणांनी अक्षरशः बाहेर हाकलून दिले. प्रसारमाध्यमांनाही मज्जाव करण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला. या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81529/shivshastra-shauryagatha-exhibition-finally-begins</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81529/shivshastra-shauryagatha-exhibition-finally-begins</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 10:06:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/shivshasktra.jpg"                         length="59272"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>डिबेंचर कपातीसह मुदतवाढीचा डाव टाकणारा तो कोण? ‘गोकुळ’च्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>&gt;&gt; शीतल धनवडे</strong></p>
<p>दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय नाटय़मय घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची माळ पडल्याने ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता आल्याचे सांगितले जात आहे; पण विना टेंडर जाजम-घडय़ाळ खरेदीप्रकरण अजूनही मिटलेले नाही तोच आता डिबेंचर कपातीचा मुद्दा पेटला आहे. या कपातीसह त्याच्या मुदतीमध्ये 10 ते 25 वर्षे वाढ करून याद्वारे पद्धतशीरपणे दूध उत्पादकांच्या घामाच्या पैशावर एकप्रकारे डल्ला मारण्यात पुढाकार घेणारा तो सत्तारूढ गटातील स्वयंघोषित अध्यक्ष कोण? दूध संस्थांना आर्थिक अडचणीत आणणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? याबाबत ‘गोकुळ’ वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.</p>
<p>ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’ दूध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81528/who-is-going-to-stake-debentures-with-maturity-date"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/gokul-dudh-sangh-kolhapur1.jpg" alt=""></a><br /><p><strong>&gt;&gt; शीतल धनवडे</strong></p>
<p>दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय नाटय़मय घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची माळ पडल्याने ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता आल्याचे सांगितले जात आहे; पण विना टेंडर जाजम-घडय़ाळ खरेदीप्रकरण अजूनही मिटलेले नाही तोच आता डिबेंचर कपातीचा मुद्दा पेटला आहे. या कपातीसह त्याच्या मुदतीमध्ये 10 ते 25 वर्षे वाढ करून याद्वारे पद्धतशीरपणे दूध उत्पादकांच्या घामाच्या पैशावर एकप्रकारे डल्ला मारण्यात पुढाकार घेणारा तो सत्तारूढ गटातील स्वयंघोषित अध्यक्ष कोण? दूध संस्थांना आर्थिक अडचणीत आणणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? याबाबत ‘गोकुळ’ वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.</p>
<p>ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’ दूध संघाच्या कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढून विरोधकांनी हवा निर्माण केली आहे. भाजपच्याच संचालिका शौमिका महाडीक यांच्या हातात आयताच हा मुद्दा आल्याने त्यांनी सत्तारूढ गटाचीच कोंडी केली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘गोकुळ’चे दूध चांगलेच तापले होते. सत्तारूढ गटाने यंदा दूध दर फरकामध्ये प्रतिलिटर 20 पैशांची वाढ दिली आहे. त्याचबरोबर हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना जाजम व घडय़ाळ्याचे वाटप केले. या सगळ्याचा आगामी गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर फायदा व्हावा, हा त्यामागील उद्देश होता. मात्र, विना टेंडर तब्बल पावणेचार कोटींचे जाजम खरेदीप्रकरण संचालक मंडळाच्या अंगलट आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी चौकशीचा ससेमिराच पाठीशी लावला आहे. तत्कालीन अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जाहीर निविदा न काढता ही खरेदी केल्याचे समोर येत असून, हा मुद्दा तापलेला असतानाच आता डिबेंचर कपातीवरून ‘गोकुळ’चे राजकारण तापले आहे.</p>
<p>निवडणुकीच्या तोंडावर डिबेंचर कपात कायम ठेवणे व त्याची मुदत आहे तशीच 10 वर्षे करणे हे सत्तारूढ गटाला फायदेशीर ठरले असते. मात्र, त्याची मुदत थेट 25 वर्षे करण्यास सांगण्यामागे नवीन संचालक मंडळात आलेल्या सत्तारूढ गटातील एका संचालकाने पद्धतशीरपणे भर घातल्याची चर्चा सध्या ‘गोकुळ’च्या वर्तुळात सुरू आहे. ज्यांनी हे करण्यास भाग पाडले व दूध संस्थांचा रोष ‘गोकुळ’वर ओढवून घ्यावा लागला, त्या दोघांनाच त्याचे स्पष्टीकरण करण्यास पत्रकार परिषदेत संचालक मंडळाने पुढे केले होते. एकूणच या संचालकाच्या हुशारीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’सह सत्तारूढ गटाच्या नेत्यांची नाचक्की झाल्याचे दिसून येत आहे. ‘आपणाला दूधातील जास्त कळतं’, अशा आविर्भावात वावरणाऱ्या या संचालकांची हुशारी इतर संचालकांच्या अंगलट आली असून, दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतणारा व दूध संस्थांना अडचणीत आणणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? याची चर्चा सध्या ‘गोकुळ’च्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.</p>
<p><strong>‘त्या’ दोन सत्तारुढ संचालकांना नेत्यांनी झापले?</strong><br />
डिबेंचर प्रकरणात विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा थेट सबंध नव्हता. स्वतःला कधीही परा‘जित’होणार नाही, असे म्हणणारे व आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या ‘त्या’ दोन संचालकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे; पण हे सगळे प्रकरण अध्यक्ष मुश्रीफ यांच्यावर शेकले. विरोधकांनी काढलेला मोर्चा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तर अध्यक्षपदासाठी धडपडणाऱ्या या संचालकांनी आपणाला अध्यक्षपद मिळाले नसल्याच्या सूड भावनेतून हा निर्णय घेण्यास भाग पाडले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.</p>
<p><strong>अजूनही अध्यक्षपदाचे डोहाळे</strong><br />
अध्यक्ष निवडीनंतर महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक लढवणार, असे नेते सांगत आहेत; पण ही महायुती होऊच नये, असे सत्तारूढ गटातील या संचालकाला अजूनही वाटत असावे, शिवाय अजूनही अध्यक्षपदाचे डोहाळे लागल्याने त्याकडे डोळे लावून बसलेल्या या संचालकानेच महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठीच हे उद्योग केले आहेत का, याचीही चर्चा सध्या सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81528/who-is-going-to-stake-debentures-with-maturity-date</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81528/who-is-going-to-stake-debentures-with-maturity-date</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 10:06:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/gokul-dudh-sangh-kolhapur1.jpg"                         length="70804"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बदली झालेल्या 1892 शिक्षकांना अद्याप कार्यमुक्ती आदेशच नाही! आदेश आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती</title>
                                    <description><![CDATA[<p>सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला, तरी अद्याप बदल्या झालेल्या 1892 शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे कार्यमुक्ती आचारसंहितेच्या चक्रात अडकण्याची भीती संबंधित शिक्षकांना सतावत आहे.</p>
<p>सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया शासकीय आदेशानुसार मे-2025 पासून पाच टप्प्यांत राबविण्यात आली होती. राज्यस्तरावरून ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. 2083 शिक्षकांचा बदली प्रक्रियेत सहभाग होता. त्यातील 6 शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली असून, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत 185 शिक्षक अयोग्य आढळून आल्याने एकूण 191 शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबवण्यात आली.</p>
<p>या संपूर्ण प्रक्रियेतून</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81527/there-is-still-no-relief-order-for-1892-transferred-teachers"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/school-teacher2.jpg" alt=""></a><br /><p>सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला, तरी अद्याप बदल्या झालेल्या 1892 शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे कार्यमुक्ती आचारसंहितेच्या चक्रात अडकण्याची भीती संबंधित शिक्षकांना सतावत आहे.</p>
<p>सातारा जिह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया शासकीय आदेशानुसार मे-2025 पासून पाच टप्प्यांत राबविण्यात आली होती. राज्यस्तरावरून ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. 2083 शिक्षकांचा बदली प्रक्रियेत सहभाग होता. त्यातील 6 शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली असून, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत 185 शिक्षक अयोग्य आढळून आल्याने एकूण 191 शिक्षकांची बदली प्रक्रिया थांबवण्यात आली.</p>
<p>या संपूर्ण प्रक्रियेतून 1 हजार 892 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे बदल्या झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु कार्यमुक्तीचे आदेशच न मिळाल्यामुळे त्यांच्या बदल्या अधांतरी राहिल्या आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले. हे सर्व शिक्षक कार्यमुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत दिवस ढकलत आहेत. त्यांच्यातील ही अस्वस्थता लपून राहिलेली नाही. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल, अशी चर्चा सुरू आहे. आता आचारसंहिता आज लागते की उद्या अशी घालमेल राजकीय कार्यकर्त्यांसह शिक्षक वर्गातही सुरू झाली आहे. परिणामी कार्यमुक्ती आचारसंहितेच्या चक्रात अडकण्याची भीती बदली झालेल्या शिक्षकांना सतावत आहे.</p>
<p><strong>बदली शिक्षक 3 रोजी नवीन शाळेवर!</strong><br />
<strong>बदल्या झालेल्या प्राथमिक शिक्षकांमधील ज्यांच्या बदल्यांच्या बाबतीत कसल्याही तक्रारी, आक्षेप, अडचणी नाहीत, अशा सर्व शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश तयार होत आहेत. दिवाळी सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबरला सकाळी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल. दुपारपर्यंत बदली झालेल्या शाळेवर त्यांना हजर व्हायला सांगणार.</strong><br />
<strong>– अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक),सातारा जिल्हा परिषद.</strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81527/there-is-still-no-relief-order-for-1892-transferred-teachers</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81527/there-is-still-no-relief-order-for-1892-transferred-teachers</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 10:06:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/school-teacher2.jpg"                         length="29914"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर आरोपी दोन्ही डॉक्टरांनी जामीन अर्ज घेतला मागे</title>
                                    <description><![CDATA[<p>अहिल्यानगर शहरातील नामांकित सहा डॉक्टरांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात कटकारस्थान करणे, खोटे कागदपत्र तयार करणे, चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारण बनणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दोन डॉक्टरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला होता. आज या अर्जावर पुन्हा सुनावणी झाली असता, दोन्ही डॉक्टरांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.</p>
<p>या गंभीर तक्रारीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे-पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर) तसेच डॉ. विखे-पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, विळद</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81526/after-all--both-the-accused-doctors-sought-land-application"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/court-hammer-drawing-61.jpg" alt=""></a><br /><p>अहिल्यानगर शहरातील नामांकित सहा डॉक्टरांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात कटकारस्थान करणे, खोटे कागदपत्र तयार करणे, चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारण बनणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी दोन डॉक्टरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अंतरिम जामीन फेटाळण्यात आला होता. आज या अर्जावर पुन्हा सुनावणी झाली असता, दोन्ही डॉक्टरांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.</p>
<p>या गंभीर तक्रारीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर (रा. अहिल्यानगर), डॉ. मुकुंद तांदळे (रा. सावेडी, अहिल्यानगर), डॉ. अक्षयदीप झावरे-पाटील (रा. अहिल्यानगर), डॉ. सचिन पांडुळे (रा. अहिल्यानगर) तसेच डॉ. विखे-पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, विळद घाट, अहिल्यानगर येथील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर आणि इतर अज्ञात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>अहिल्यानगरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे (वय 47, रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत धक्कादायक आरोप केले आहेत. संबंधित डॉक्टरांनी कोरोनाचा खोटा अहवाल तयार करून अवयवदानाच्या नावाखाली अवयवांची तस्करी केल्याचा संशय असून, चुकीच्या पद्धतीने उपचार देऊन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावे नष्ट करून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.</p>
<p>या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या डॉ. गोपाळ बहुरुपी (रा. न्युक्लिअस हॉस्पिटल, अहिल्यानगर) आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी मंगळवारी (दि. 21) न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायाधीश एम. एच. शेख यांनी त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. आज पुन्हा सुनावणीदरम्यान दोन्ही डॉक्टरांनी स्वतःच आपले जामीन अर्ज मागे घेतले आहेत.</p>
<p>या प्रकरणातील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे. संबंधित हॉस्पिटल्स व लॅबची नोंद, रुग्णांचे उपचार रेकॉर्ड आणि अवयवदानाशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81526/after-all--both-the-accused-doctors-sought-land-application</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81526/after-all--both-the-accused-doctors-sought-land-application</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 10:06:16 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/court-hammer-drawing-61.jpg"                         length="98371"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पाथर्डी पोलीस ठाण्यातच महिलांची हाणामारी; एसटी बसमध्ये बसलेल्या चार महिलांचा जागेवरून वाद</title>
                                    <description><![CDATA[<p>पाथर्डी-अहिल्यानगर एसटी बसमध्ये बसलेल्या चार महिलांचा जागेवरून वाद होत आपसात मारामारीचा प्रकार घडला. वाद आणखी विकोपाला जाऊ नये म्हणून वाहकाने एसटी पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांसमोरच या महिलांमध्ये हाणामारी झाली. अखेर चारही महिलांना पोलिसांनी अटक केली.</p>
<p>अर्चना कांदे चव्हाण (रा. साकेगाव, ता. पाथर्डी) या तिची आई लता भोसले (वय 50) यांच्यासोबत पाथर्डी बसस्थानकातून अहिल्यानगरकडे निघाल्या होत्या. बसमध्ये बसल्यानंतर जागेवरून त्यांचा वाद मेघा संजय भोसले (रा. आगासखांड, ता. पाथर्डी) यांच्याशी झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर वाहकाने बस पोलीस स्टेशनमध्ये आणली. मात्र, तेथेही त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत पोलीस स्टेशनला अगोदरच उपस्थित असलेल्या वाळुबाई काळे यासुद्धा सहभागी झाल्या.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/81525/pathardi-police-thanyanach-mahilaanchi-hanamari"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-10/st-rada-1.jpg" alt=""></a><br /><p>पाथर्डी-अहिल्यानगर एसटी बसमध्ये बसलेल्या चार महिलांचा जागेवरून वाद होत आपसात मारामारीचा प्रकार घडला. वाद आणखी विकोपाला जाऊ नये म्हणून वाहकाने एसटी पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांसमोरच या महिलांमध्ये हाणामारी झाली. अखेर चारही महिलांना पोलिसांनी अटक केली.</p>
<p>अर्चना कांदे चव्हाण (रा. साकेगाव, ता. पाथर्डी) या तिची आई लता भोसले (वय 50) यांच्यासोबत पाथर्डी बसस्थानकातून अहिल्यानगरकडे निघाल्या होत्या. बसमध्ये बसल्यानंतर जागेवरून त्यांचा वाद मेघा संजय भोसले (रा. आगासखांड, ता. पाथर्डी) यांच्याशी झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर वाहकाने बस पोलीस स्टेशनमध्ये आणली. मात्र, तेथेही त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत पोलीस स्टेशनला अगोदरच उपस्थित असलेल्या वाळुबाई काळे यासुद्धा सहभागी झाल्या.</p>
<p>या नंतर महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वडते, मनीषा धाने, चंद्रावती शिंदे व सुरेखा गायकवाड यांनी हे भांडण सोडविले. परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी चारही महिलांना अटक केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/81525/pathardi-police-thanyanach-mahilaanchi-hanamari</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/81525/pathardi-police-thanyanach-mahilaanchi-hanamari</guid>
                <pubDate>Wed, 29 Oct 2025 10:06:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-10/st-rada-1.jpg"                         length="63187"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        