राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी झाले. याशिवाय स्फोटात आसपासच्या अनेक वाहनांनाही आग लागली. याचा तपास गृहमंत्रालयाने NIAकडे सोपवला आहे. मात्र, या स्फोटाबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षिततेचे काय? असा संतप्त सवाल सरकारला केला आहे.

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा सीएनजी स्फोट होता की आणखी काही याबद्दल स्पष्टता नाही. देशाच्या राजधानीतील लाल किल्ला परिसर सुरक्षित नाही, तर मग देशाच्या सुरक्षिततेचे काय? असा सवालही त्यांनी केला आहे. स्फोटाची घटना घडली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा बिहारच्या निवडणुकीत गुंतले होते. त्यानंतर पंतप्रधान परदेश दौऱ्यावरही जाऊन आले आहेत.

दिल्लीतील स्फोटाला दोन दिवस झाले असले तरी ती घटना बॉम्बस्फोट होती, सीएनजी स्फोट होता की आणखी काही, याबाबत गृहमंत्रालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत काहीच स्पष्टता नाही. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अद्याप कोणतीही माहिती देण्यात येत नाही. देशाच्या राजधानीतच अशी घटना घडते, राजधानीच सुरक्षित नसेल तर देशात आज कोण सुरक्षित आहे? असा प्रश्नही त्यांनी केला. देशातील गुप्तचर यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांची स्थिती काय आहे? ते नेमके काय करत आहेत? या घटनेची माहिती त्यांना कशी मिळाली नाही? असे प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. सरकारने हाय अलर्ट जारी केले आहे. मात्र, याबाबत योग्य ती माहिती देत स्पष्टीकरण करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उकडलेले अंडे  की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ? उकडलेले अंडे की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?
अंडी वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हटला जातो. याचे कारण अंड्यात अनेक व्हिटामिन्स , मिनरल्स तर असतात शिवाय...
राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी
Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
भरुचमध्ये फार्मा कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 2 कामगार ठार, 20 जण जखमी
मुंबई फिरायला आला अन् घात झाला, निर्माणाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू