सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत. देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3.30 वाजता मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. हा मेल कुणी आणि कुठून पाठवला याची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मात्र यात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उकडलेले अंडे  की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ? उकडलेले अंडे की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?
अंडी वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हटला जातो. याचे कारण अंड्यात अनेक व्हिटामिन्स , मिनरल्स तर असतात शिवाय...
राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी
Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
भरुचमध्ये फार्मा कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 2 कामगार ठार, 20 जण जखमी
मुंबई फिरायला आला अन् घात झाला, निर्माणाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू