शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…

शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…

गेल्या आठवड्याच दबावात असलेला शेअर बाजार या आठवड्यात मंगळवारपासून तेजीत आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बाजार तेजीत असला तरी ऐनवेळी होणाऱ्या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात सर्तकतेने व्यवहार करावेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी असंख्य एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. जवळजवळ सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारच्या जोरदार पुनरागमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल अनेक वेळा अपयशी ठरले असले तरी खरे चित्र १४ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होईल. त्यामुळे गुतंवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 595 अंकांची वाढ नोंदवत 84,466.51 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 180.85 अंक म्हणजेच 0.70% वाढ नोंदवत 25,875.80 वर बंद झाला, बँक निफ्टी 136.50 अंक म्हणजेच 0.23% वाढ नोंदवत 58,274.65 वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदार उत्साहात आहेत. मात्र, गुतंवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर शेअर बाजारात उत्साह दिसत आहे. मात्र, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अपेक्षेपेक्षा कमी जागा जिंकल्या तर बाजार काही काळासाठी घसरू शकतो. एनडीएने कमी जागा जिंकल्या तर निफ्टीत ५ ते ७ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. या काळात परदेशी गुंतवणूकदार देखील त्यांचे पैसे काढून घेऊ शकतात, ज्यामुळे रुपया किंचित कमकुवत होऊ शकतो आणि बाजार अस्थिर होऊ शकतो. चलन, बाँड दर आणि नफा वाढू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच टॅरिफबाबत ट्रम्प यांनी काही संकेत दिले आहेत. त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उकडलेले अंडे  की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ? उकडलेले अंडे की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?
अंडी वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग म्हटला जातो. याचे कारण अंड्यात अनेक व्हिटामिन्स , मिनरल्स तर असतात शिवाय...
राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी
Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
भरुचमध्ये फार्मा कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 2 कामगार ठार, 20 जण जखमी
मुंबई फिरायला आला अन् घात झाला, निर्माणाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू