राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी

राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी

अर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक, नागपूर आणि धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना (DCCB) भागभांडवल म्हणून एकूण 827 कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने तोट्यात असलेल्या धाराशीव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त करण्यास आणि प्रशासक नेमण्यासही मंजुरी दिली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार या बँकेचे नियंत्रण अलीकडे काँग्रेस, अजित पवार गट , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांच्या संचालकांकडे होते. मात्र, हे संचालक अलीकडेच भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षात सामील झाले आहेत.

ही बँक सतत तोट्यात होती तसेच, मागील वर्षीच सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेला या बँकेसाठी प्रशासक नेमण्याची शिफारस केली होती, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयांचा संबंध ग्रामीण महाराष्ट्रातील बँकांशी असल्याने, 2 डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचे उल्लंघन यात होत नाही.

एकूण मंजूर रकमेतून नाशिक जिल्हा बँकेसाठी 672 कोटी रुपये, नागपूर जिल्हा बँकेसाठी 81 कोटी रुपये आणि धाराशीव जिल्हा बँकेसाठी 74 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेने सरकारला नाशिक, नागपूर आणि धाराशीव जिल्हा बँकांच्या पुर्नभांडवल आणि पुनरुज्जीवनाबाबत कळवले आहे. या बँका शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या नाशिक आणि नागपूर जिल्हा बँका प्रशासकांच्या अखत्यारीत चालवल्या जात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हिवाळ्यात सिंघाडा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
सिंघाडा हे एक अत्यंत पौष्टिक आणि निरोगी फळ आहे. हिवाळ्यात आपल्याला बाजारात सिंघाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. सिंघाड्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे...
हिवाळ्यातील हे आहे ‘गोल्डन सुपर सीड’, शरीराला उबदार तर ठेवेलच, रक्तातील साखरही नियंत्रित होईल, वाचा याचे आश्चर्यकारक फायदे
‘डोमेस्टिक क्रिकेट खेळा’ BCCI चा विराट कोहली आणि रोहित शर्माला सल्ला; रोहितने भूमिका केली स्पष्ट
Video दिल्ली बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, भर ट्राफिकमध्ये…
Delhi Blast Case : दिल्ली स्फोटाप्रकरणी सुरक्षादलाकडून मोठी कारवाई, जम्मू कश्मीरमधून आणखी एक डॉक्टर ताब्यात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर रस्त्यात गाय आडवी आल्याने भीषण अपघात, दोनजण गंभीर तर गायीचा दुर्दैवी मृत्यू
भोपळा हे नाव ऐकताच, तुम्हीपण नाक मुरडताय का? वाचा याचे आरोग्यवर्धक फायदे