भाव पडल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यातील खड्डे कांद्यांनी भरले, संगमनेरात संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी

भाव पडल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यातील खड्डे कांद्यांनी भरले, संगमनेरात संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी

कांद्याला क्विंटलला अवघा 180 रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये टाकून ते भरून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे काहीही घेणे-देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

वडगाव पान येथे कांद्याला 180 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्तेदुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे खड्डय़ांमध्ये टाकून खड्डे भरून घेतले. यावेळीही आमच्याकडून सरकारला मदत, असा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, नीलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात, सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात, सतीश थोरात, सुनील थोरात, अविनाश थोरात, गणपत थोरात यांच्यासह युवक व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच – गायकवाड

n बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे, त्यांना गोरगरीब शेतकऱ्यांचे काही घेणे-देणे नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ, अशा घोषणा निवडणुकीत करण्यात आल्या. मात्र, आता तसे काही झाले नाही. उलट आज कांद्याला क्विंटलला 180 रुपये भाव ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. सरकारकडे पैसे नाहीत, घोषणाबाजी मात्र खूप करतात. त्यामुळेच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आम्ही शेतकरी पाच ट्रक्टर भरून कांदे सरकारला देत आहोत, असा संताप गायकवाड यांनी व्यक्त केला.

सरकारविरोधात लढा उभारा – विक्रम ओहोळ

n विक्रम ओहोळ म्हणाले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात कृषी व महसूलमंत्री असताना त्यांनी कायम शेतकऱ्यांना मदत केली. आत्ताचे कृषिमंत्री, महसूलमंत्री यांना शेतकऱ्यांचे काही पडलेले नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असून, या सरकार विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारचे दिवस भरलेत – थोरात

n तरुणांना काम नाही, बेरोजगारी वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही, अशी स्थिती असताना तरुणांना मोबाइलमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. इन्स्टाग्रामच्या जमान्यात वेगवेगळ्या रील्स तयार करायच्या. अभद्र टीका करायची, असे उद्योग सुरू आहेत. या सरकारचे दिवस आता भरले असून, सर्वसामान्य नागरिक पेटला आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी युवकांनी एकत्र येऊन लढा उभारावा, असे आवाहन नीलेश थोरात यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Delhi Bomb Blast – फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या मास्टरमाइंडने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे केले ब्रेन वॉश, वाचा नेमकं काय घडलं Delhi Bomb Blast – फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या मास्टरमाइंडने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे केले ब्रेन वॉश, वाचा नेमकं काय घडलं
दिल्लीत सोमवारी कारमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. देशाच्या तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान असताना आता दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाईंण्ड...
दिंडीत कंटेनर घुसला; महिला ठार, नऊ जखमी; संतप्त वारकऱ्यांचा रास्ता रोको
राज्य सरकारकडून तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 827 कोटी रुपयांचा निधी
ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावे गुजराती, तामीळ, कानडी भाषेत; त्वरित दुरुस्ती करा.. शिवसेनेचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
घरातील फुलझाडांना घाला ‘या’ पद्धतीने खत, झाडांना येतील खूप सारी फुले
रायगडात 388 कुष्ठरुग्ण
पोलीस डायरी – पुण्यातील डोळस कुटुंब उद्ध्वस्त, बुवा व बायांपासून सावधान!